शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

CoronaVirus : ‘मरेल का हो हा विषाणू’, ‘परिवर्तन’ची लघुपटाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 10:56 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा डोकं वर काढत असलेल्या विशिष्ट धर्मद्वेषाचा विषाणू कधी मरणार, असा प्रश्न उपस्थित करत लघुपटाच्या ...

ठळक मुद्दे‘मरेल का हो हा विषाणू’ : लघुपटाची निर्मिती‘परिवर्तन’ने मांडला धर्मद्वेषाचा प्रश्न

कोल्हापूर : कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा डोकं वर काढत असलेल्या विशिष्ट धर्मद्वेषाचा विषाणू कधी मरणार, असा प्रश्न उपस्थित करत लघुपटाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या तरुणाईने त्यावर प्रकाशझोत टाकला आहे.

‘मरेल का हो हा विषाणू,’असा प्रश्न उपस्थित करत परिवर्तन कला फौंडेशनने ‘विषाणू’ या लघुपटाची निर्मिती केली असून पहिल्याच दिवशी समाजमाध्यमांवर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्याविरोधात लॉकडाऊनचे शस्त्र उगारण्यात आले. भारत धर्मनिरपेक्ष देश असून येथे सर्व जातिधर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. मात्र, दिल्लीतील मरकज येथील घटनेनंतर देशातील नागरिकांमध्ये विशिष्ट धर्माच्या नागरिकांबद्दल तीव्र नाराजीचे वातावरण तयार झाले.

अनेक वर्षे एकमेकांचे सख्खे शेजारी, जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली आहे. हे सलोख्याचे वातावरण एका घटनेने कलुषित झाले आणि सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेतून विरोधी मतांचा सूर ऐकू येऊ लागला.

या चर्चेमुळे अस्वस्थ झालेल्या परिवर्तन कला फौंडेशनच्या कलाकारांनी पाच मिनिटांच्या लघुपटाच्या माध्यमातून नागरिकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.कोरोनाचा विषाणू काही दिवसांत मरेलही पण धर्मद्वेषाचा विषाणू मरायला हवा, या परिस्थितीत सगळ्यांनी एकमेकांचे द्वेष करण्याऐवजी एकमेकांना सहकार्य करून पुढे जाण्याची गरज आहे, हा संदेश त्यांनी दिला आहे.

लघुपटाचे दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण यांनी केले असून युवराज पाटील यांचे लेखन आहे. त्यात रितीकाराजे, रोनितराजे व अजित पाटील यांनी भूमिका निभावल्या आहेत. हा लघुपट मंगळवारी समाजमाध्यमांवर अपलोड करण्यात आला असून त्याला एका दिवसातच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShort Filmsशॉर्ट फिल्मkolhapurकोल्हापूर