शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जीएसटी वाढीचे संकट, वस्त्रोद्योगासाठी बैठक कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 17:01 IST

वाढीव वीज बिल, कमी केलेले अनुदान, बंद झालेल्या सवलती, वाढलेली महागाई, सुताची साठेबाजी, शासनाचे कुचकामी धोरण अशा विविध घडामोडींमुळे दिवसेंदिवस बिकट परिस्थितीकडे वस्त्रोद्योगाची वाटचाल सुरू झाली आहे. त्यातून तारेवरची कसरत करत वस्त्रोद्योजक आपला व्यवसाय चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अतुल आंबी

इचलकरंजी : शासनाने वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांसाठी एकसमान जीएसटी कर करण्याच्या नादात बारा टक्के जीएसटी आकारणीची घोषणा केली आहे. १ जानेवारी २०२२ पासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या निर्णयामुळे वस्त्रोद्योगात अस्थिरता निर्माण झाली असून, शासनाने फेरविचार करावा, अशी सर्वच स्तरांतून मागणी होत आहे. त्यावर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू असली तरी ही बैठक होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या दहा वर्षात वस्त्रोद्योगात दिवसेंदिवस अस्थिरता निर्माण होत चालली आहे. सुरुवातीच्या काळात वस्त्रोद्योगाला सर्व बाजूंनी ‘अच्छे दिन’ होते. परंतु वाढीव वीज बिल, कमी केलेले अनुदान, बंद झालेल्या सवलती, वाढलेली महागाई, सुताची साठेबाजी, शासनाचे कुचकामी धोरण अशा विविध घडामोडींमुळे दिवसेंदिवस बिकट परिस्थितीकडे वस्त्रोद्योगाची वाटचाल सुरू झाली आहे. त्यातून तारेवरची कसरत करत वस्त्रोद्योजक आपला व्यवसाय चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु प्रत्येक वेळी नवीन संकट निर्माण होते. त्याला तोंड देऊन पुढे जाईपर्यंत पुन्हा नवीन संकट येते.

वीज सवलतीसाठी ऑनलाइन नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून मार्ग काढण्याची धडपड सुरू असतानाच नव्याने जीएसटी वाढीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामध्ये पाच टक्के असलेला जीएसटी कर आता १२ टक्क्यांवर जाणार आहे. परिणामी कापड उत्पादकांची जादा गुंतवणूक होण्याबरोबरच कपड्यांचे दर वाढणार आहेत. रोटी, कपडा, मकान या प्रमुख तीन गरजांपैकी अन्य दोन गरजांच्या किमतीत वाढ झालीच आहे. त्यापाठोपाठ आता कपड्यांचे दर वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

याविरोधात आवाज उठवत विविध संघटनांनी शासनाकडे एक तर संपूर्ण वस्त्रोद्योगातील घटकांना ५ टक्के जीएसटी आकारा; अन्यथा पूर्वीप्रमाणेच कर आकारणी सुरू ठेवा. वाढीव कर आकारणी रद्द करा, अशी मागणी होत आहे. त्यावर नीती आयोगाच्यावतीने लवकरच जीएसटी परिषदेची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यामध्ये बारा टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत जीएसटी कमी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु डिसेंबरचा पहिला आठवडा उलटला तरी अद्याप बैठकीचा पत्ता नाही. बैठक होऊन त्यामधील निर्णय पुढे प्रक्रियेला जाऊन अंमलात येईपर्यंत जानेवारी २०२२ उजाडल्यास कर आकारणीची अंमलबजावणी होऊन गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

कापड निर्यातीवरही परिणाम शक्य

सर्व प्रकारच्या कापडावर पाच टक्के असणारा जीएसटी वाढवून १२ टक्के करण्यात आला. कापड प्रक्रिया-डाईंग ॲण्ड ब्लिचिंग आणि कापड तयार करणारे गारमेंट त्यांचाही वाढवून १२ टक्के झाला. त्यामध्ये सिंथेटिक धाग्यासाठी पूर्वीप्रमाणे १२ टक्केच जीएसटी आहे. तर फक्त मानवनिर्मिती धाग्यावर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के झाला. या प्रक्रियेमुळे अन्य देशांतील कापड उत्पादकांशी स्पर्धा करताना अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTextile Industryवस्त्रोद्योगGSTजीएसटी