शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
3
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
4
आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याला गेले; हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
5
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
6
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
7
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
8
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
9
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
10
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
12
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
13
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
14
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
15
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
16
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
17
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
18
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
19
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
20
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

कश्मीरमे पहले से ज्यादा शांती है, अनुभवाच्या चटक्यांवर फुंकर मारून पुढे झेपावलेल्या काश्मिरी मुलींच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 3:48 PM

‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे.

इंदुमती गणेशकोल्हापूर : ‘एक वक्त था जब रात को कोई दरवाजा खटखटाता था, हम जान मुठ्ठी में लेके बाहर आते थे, लोगों को इकठ्ठा करके बेमतलब तंग किया जाता था, जवानों को मारा जाता था, लडकी के साथ बुरा न हो इसिलिए १८ साल मे ही मेरी बहन की शादी करा दी गई... आज भी कभी दंगे फसाद होते है पर हमें आदत हो गई, इतना सुकून है की, पहले से जादा अमन और शांती है... कही बताई बातों पे विश्वास ना करें... निडर होके कश्मीर आईये आपका स्वागत है...’ हे शब्द आहेत काश्मीरमधील सामाजिक परिस्थितीने हाेरपळलेल्या मुलींचे. अनुभवांच्या चटक्यांवर फुंकर मारून त्या नव्या वाटा, नव्या दिशांकडे झेप घेत आहेत.बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या पुढाकारातून सध्या जम्मू-काश्मीरमधील ४० मुली कोल्हापुरात आल्या आहेत. कोल्हापुरी पाहुणचाराने त्या जाम खुश झाल्या. नवं काही बघितल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद त्यांच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर आणि भुऱ्या डोळ्यांमधून तरळत होता. या मुली कुपवाडा, जम्मू, काश्मीर येथील निवासी आश्रमशाळांमध्ये राहतात. यातील सर्वात लहान मुलगी आहे पाच वर्षांची. तिला आपण संस्थेत कसे आलो माहीत नाही. अनेक मुलींचे आई किंवा वडील किंवा दोघेही काश्मीरमध्ये झालेल्या दंगली, अतिरेकी हल्ले व गोळीबार अशा दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत.सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेली बसेरा ए तबस्सुम म्हणते, ‘‘आम्ही फार वाईट परिस्थितीमधून इथपर्यंत आलो आहाेत. वडील वारले, आई कसं तरी घर चालवते. मी संस्थेत येऊन १६ वर्ष झाली. अनेक मुली चांगल्या शिकून नोकरी करत आहेत, घराची जबाबदारी पेलत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.’’ नगीना बशीर या १४ वर्षांच्या मुलीला पाच बहिणी, एक भाऊ आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. गुलशन आरा, निकिता, आफरिना अशा सगळ्या मुलींची कहाणी वेगळी आहे, पण दु:खाचा धागा एकच आहे. परिस्थितीच्या काट्यांवरून चालताना होणाऱ्या वेदना मागे सोडताना त्यांच्यामध्ये नवे ध्येय गाठण्याची इच्छा आहे आणि समान धाग्याने त्यांना बांधून ठेवले आहे.

सरकारे कौन सी भी हो, आम आदमीही मरता हैतुम्हाला काश्मीर सरकारकडून काय अपेक्षा आहे? यावर तबस्सुम ही आश्रमशाळेचे मॅनेजमेंट बघणारी मुलगी म्हणाली, ‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे. पण भविष्यात हे चित्र बदलेल, अशी आशा आहे. आमच्याकडे बेरोजगारी प्रचंड आहे. उत्पन्नाच्या साधनांवर मर्यादा आहे. राेजगार मिळाला की अर्धे प्रश्न आपोआप मिटतील.’’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJammu Kashmirजम्मू-काश्मीर