शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
3
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
4
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
5
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
6
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
7
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
8
“चारवेळा CM असताना शरद पवारांना आरक्षणाचा मुद्दा का आठवला नाही”; शिंदे गटातील नेत्याचा सवाल
9
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
10
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
11
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
12
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
14
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
15
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
16
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
17
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
18
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
19
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
20
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश

शिव्या शाप देणे, चिखलफेक करणे बरे नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:29 AM

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजू शेट्टीसारख्या जबाबदार नेत्याला अशाप्रकारची वक्तव्य शोभत नाही, दुसऱ्यांना शिव्या शाप देणे, चिखलफेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजू शेट्टीसारख्या जबाबदार नेत्याला अशाप्रकारची वक्तव्य शोभत नाही, दुसऱ्यांना शिव्या शाप देणे, चिखलफेक करणे व नाहक आरोप करणे बरे नव्हे, जनतेच्या आशीर्वादाने आपण लाभार्थी झाल्याचा असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांच्यावर केला.

‘स्वाभिमानी’च्या आक्रोश मोर्चात, ‘हसन मुश्रीफ माझ्या नादाला लागू नका, महागात पडेल’ असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. त्याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, महापुरातील नुकसानीचे ‘एसडीआरएफ’ निकषांनुसार प्राथमिक नुकसानभरपाईचा निर्णय झाला आहे. अंतिम निर्णय अद्याप नाही. पाणी गेलेल्या घरमालकांच्या खात्यावर दहा हजारांप्रमाणे पैसे जमा होत आहेत. पिकांच्या पंचनामे अंतिम टप्प्यात असताना शेट्टी यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. निर्णय झालेला नाही, त्यामुळे मोर्चा काढू नका, असे आपण व पालकमंत्री सतेज पाटील यांनी विनंती केली होती तरीही मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, अलीकडे त्यांच्या वक्तव्यांवरुन त्यांनी दिशा बदलल्याचे दिसते, असे सांगितले. गेली ३०-३५ वर्षे आपण सामाजिक कार्यकर्ता आहे, लोकांची सेवा करत जनतेच्या आशीर्वादाने लाभार्थी झालो. जिल्ह्यात पक्षातील एकालाच मंत्रिपद मिळते, ज्याप्रमाणे ‘स्वाभिमानी’मधून केवळ शेट्टीच आमदार, खासदार झाले. प्रतिमा बनवण्यासाठी आम्हाला अनेक वर्षे खर्ची घालावी लागली, वक्तव्ये करताना कोणाचा अपमान होणार नाही, मने दुखावणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. राजकारणात चढ-उतार येत असतात. मात्र, दुसऱ्याला शिव्या-शाप देऊन परिस्थिती बदलत नसते.