शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
6
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
7
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
8
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
9
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
10
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
11
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
13
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
14
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
15
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
16
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
17
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
18
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
19
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
20
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार

दादागिरी केल्यास पायताणाने हाणल्याशिवाय सोडणार नाही; भाजप उमेदवार सत्यजित कदमांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 11:30 AM

गेल्या निवडणुकीत यांनी हिंदुत्ववादी विचाराचा पराभव करून शिवसेना संपविली ही जनता व शिवसैनिक विसरलेले नाहीत.

कोल्हापूर : मी बोलणारा नव्हे, तर काम करून दाखविणारा कार्यकर्ता आहे. परंतु, ‘कोल्हापूर उत्तर’च्या निवडणुकीत आमच्या सभेला, प्रचाराला आलेल्या लोकांना फोन करून दादागिरी करणे सुरू आहे. असा प्रयत्न पुन्हा झाल्यास पायताणाने हाणल्याशिवाय मी सोडणार नाही, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी गुरुवारी शिवाजी पेठेतील सभेत केले. त्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यावर त्याबद्दल समाजातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कोल्हापूरची ही राजकीय संस्कृती नाही असे सांगतानाच ही निवडणूक कोणत्या थराला जाईल, अशी भीतीही लोकांनी व्यक्त केली.

भाजपचे राज्य प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण ताजे असतानाच कदम यांच्या वक्तव्याची त्यात भर पडली. शहराच्या विकासाचा अजेंडा, राजकीय टीकाटिप्पणी करण्यापेक्षा अरेतुरेची भाषा, शिवीगाळ, अश्लाघ्य भाषेतील टीका सुरू असल्याने या निवडणुकीस वेगळेच वळण लावले जात आहे. सामाजिक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न पद्धतशीर सुरू आहेत.

या सभेत बोलताना उमेदवार सत्यजित कदम म्हणाले, कालच कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यांनी मला बिनशर्त पाठिंबा दिला. कोल्हापूर हे हिंदुत्ववादी विचारांचेच शहर असल्याचे प्रत्त्यंतर यापूर्वी आले आहे. आतापर्यंत फक्त दोनवेळा काँग्रेसचा विजय झाला आहे. सलग तीस वर्षे हिंदुत्ववादी विचाराचा उमेदवार निवडून आला आहे.

गेल्या निवडणुकीत यांनी हिंदुत्ववादी विचाराचा पराभव करून शिवसेना संपविली ही जनता व शिवसैनिक विसरलेले नाहीत. मी केव्हा जास्त आक्रमक बोलत नाही; परंतु आता बोलावे लागत आहे. आमच्या प्रचाराला, सभेला गेला म्हणून दादागिरी केल्यास मी त्याला पायताणाने हाणल्याशिवाय सोडणार नाही. मला निवडून दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचे सर्व प्रश्न सोडवीन असे कदम यांनी सांगितले.

उमेदवार कदम यांच्याआधी भाषणे केलेल्या प्रा. जयंत पाटील व सुनील कदम यांनीही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मी महापौर असताना हा तिसऱ्या फळीत उभा होता, त्याच्या सगळ्या कुंडल्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असे सुनील कदम यांनी सांगितले.

बावडेकरांचे पाप

विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत मालोजीराजे यांना पाडण्याचे पाप बावडेकरांनी केल्याची टीका सत्यजित कदम यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपा