शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 11:42 PM

कुरुंदवाड : येथील पंचगंगा नदीला पुन्हा दूषित पाणी आले आहे. काळेकुट्ट पाण्यामुळे पाण्याला उग्र वास सुटला असून, नदीपात्रात मृत ...

कुरुंदवाड : येथील पंचगंगा नदीला पुन्हा दूषित पाणी आले आहे. काळेकुट्ट पाण्यामुळे पाण्याला उग्र वास सुटला असून, नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. एकीकडे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी आमदार उल्हासपाटील यांचा पंचगंगा नदी संगम ते उगम जागर पदयात्रा सुरू असताना याप्रश्नाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी जागर आंदोलन काळातच नदी प्रदूषणाचा प्रश्न तीव्र झाल्याने प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.पंचगंगा नदी शिरोळ-हातकणंगले तालुक्याला वरदान ठरली आहे. मात्र, या नदीमध्ये कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पंचगंगा नदी ही गटारगंगा बनली आहे. नदी प्रदूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे.प्रदूषित पाण्यामुळे शेतीबरोबर माणसांच्या आरोग्यावरही विपरीतपरिणाम होत असल्याने गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पंचगंगा काठावरीलविविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी प्रदूषणविरोधी आंदोलन केले. मात्र, आंदोलकांचा आंदोलनातीलसातत्याचा अभाव, राजकीय पाठबळाचा अभाव, प्रदूषण नियंत्रण मंडळांचे औद्योगिक कारखान्याशी असलेले लागेबांधे, आदी कारणामुळेप्रदूषण मंडळाच्या नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जुजबी कारवाईमुळेहा नदी प्रदूषण प्रश्न दिवसेंदिवस वाढतच गेला.नदी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा. त्यासाठी ठोस निर्णय व अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी शुक्रवारपासून सोमवारअखेर कुरुंदवाड येथीलपंचगंगेचा संगम ते प्रयाग चिखली येथील उगमापर्यंत जागर पदयात्रा काढली आहे. कृषीभूषण बुधाजीराव मुळीक, खासदार उदयनराजे भोसले यांच्या सहभागाने पंचगंगा काठच्या नागरिकांच्या प्रतिसादामुळे पदयात्रा गाजत आहेत. या प्रश्नाला राजकीय ताकद लागल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता नागरिकांत मानली जात असताना आंदोलन काळात पंचगंगा पुन्हा दूषित पाण्याने ग्रासली आहे.