शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

ऊस क्षेत्रात होणार घट

By admin | Published: December 13, 2015 11:03 PM

आजरा तालुका : पर्यायी पिकांना प्राधान्य

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाण्याअभावी ऊस पिकाच्या वजनामध्ये झालेली घट, वन्य प्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान, उपसाबंदीचे संकट व पर्यायी भात पिकास मिळणारे घसघशीत दर यामुळे आजरा तालुक्यात ऊस क्षेत्रात यावर्षी घट होणार हे स्पष्ट होऊ लागले आहे.आजरा तालुक्यातून सुमारे पावणेदोन लाख टन ऊस उत्पादित होतो. त्यातील सरासरी ६० हजार टन ऊस प्रतिवर्षी बाहेरच्या साखर कारखान्यांना जातो. हा धोका स्थानिक आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ओळखून बाहेरच्या तालुक्यातील उसाला गाळपासाठी गेले चार वर्षे प्राधान्य दिले आहे. या प्रकारामुळे स्थानिक ऊस उचल करण्याचे नियोजन कोलमडते. परिणामी, तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.वर्षभर कष्ट करून पदरात काही पडेल याची खात्री उसाबाबत नाही, तर चार महिन्यांत भात पीक घेऊन घसघशीत उत्पन्न मिळण्याची हमी, असे चित्र असल्याने तालुक्यात यापुढे ऊस उत्पादन घटणार हे स्पष्ट आहे.एकीकडे ऊस उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची होत असलेली दमछाक, दरासाठी करावा लागणारा संघर्ष असे चित्र असताना दुसरीकडे भात पिकास मिळणारा घसघशीत दर, दारापर्यंत येऊन उचलीसाठी व्यापाऱ्यांकडूनच केली जाणारी धडपड, असा विरोधाभास दिसत आहे. हा विरोधाभासही उसाचे उत्पादन कमी होण्यास कारणीभूत ठरू लागला आहे.तांदूळ विक्री केंद्रांत वाढऊस उत्पादकांसमोर ऊस उचल करण्यासाठी ऊसतोड टोळ्यांकडे करावी लागणारी विनवणी, शेती सेंटर आॅफिसला मारावे लागणारे खेटे, शेवटच्या टप्प्यात ऊसतोड टोळ्यांना द्यावी लागणारी भरमसाठ स्वरूपातील खुशाली, अशा सर्व प्रकारांना सामोरे जाण्याचे धाडसही हळूहळू कमी होऊ लागले आहे. एकीकडे ऊस उत्पादकांची अवस्था अशी असताना दुसरीकडे भात पिकाला मात्र चांगले दिवस येऊ लागले आहेत. घनसाळसारख्या भाताला विक्रमी ३५०० पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळू लागला आहे. दिवसेंदिवस पर्यटकांच्या वाढत्या मागणीमुळे ठिकठिकाणी तांदूळ विक्री केंद्रे उघडली जात आहेत. भात उत्पादकांच्या बांधावर जाऊन व्यापारी वर्ग भात खरेदी करू लागला आहे.जंगलामध्ये पाण्याचे संपत आलेले साठे आणि चाऱ्याची निर्माण झालेली टंचाई यामुळे वन्य प्राण्यांनी शेतातील पिके आपले लक्ष्य बनविले आहे. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हतबल होऊन पिकांचे होणारे नुकसान बघत बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. साधारणत: आॅक्टोबर महिन्यापासून वन्य प्राण्यांचा त्रास होतो.पाणीटंचाईचे संकट : पिकासाठी पाणी कोठून आणणार?यावर्षी तर तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण संकट आहे. महसूलकडून पाणी उपसाबंदीचे हत्यार उपसले जात आहे. पाण्याचे साठे कोरडे पडू लागले आहेत. अशावेळी पिकासाठी पाणी कोठून आणायचे? हा प्रश्न आतापासून शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. पाणीच नसेल, तर ऊस कसा घ्यायचा? हा प्रश्नही बोलका आहे.