शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

..तरी शरद पवार यांची भीती का वाटते, जाणीवपूर्वक प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:56 IST

मोठा विजय मिळूनही पवार यांची भीती का वाटते

कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांना शरद पवार यांचा मोठा आधार होता. त्यांनी एफआरपी, इन्कमटॅक्ससह अनेक प्रश्ननांवर तोडगा काढण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या मनात पवार यांच्याविषयी आदराची भावना आहे. मात्र, सध्याच्या स्थितीला त्यांची ही प्रतिमा जाणीवपूर्वक डागळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या कृषी मंत्रिपदाच्या काळात शेतकऱ्यांना मोर्चा काढावा लागला नाही. सध्या मात्र, कृषिमंत्री कोण आहे याची अनेकांना माहिती नाही. पवार यांना वारंवार जेवढे टार्गेट केले जात आहे. मात्र, जितके टार्गेट कराल तेवढे त्यांच्यासोबत मराठी माणूस एकत्र येईल. इतका मोठा विजय मिळूनही पवार यांची भीती का वाटते, असा सवालही त्यांनी केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, आर.के. पोवार उपस्थित होते.

सवलतीच्या पैशाच्या वसुलीसाठीच दरवाढएस. टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली, पण या सवलतीचे पैसे भाड्यात वाढ करून सरकारने भरपाई सुरू केली असून, दरवाढ न करता तिजोरीतून हे पैसे द्यावेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

गुंतवणूक कागदारवर राहू नयेदावोसमध्ये मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी राज्यासाठी १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे, याचे स्वागत करतो. हे सर्व भारतातीलच गुंतवणूकदार आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारी आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर कारखाने सुरू करावेत व बेरोजगार युवकांना संधी द्यावी. ही गुंतवणूक कागदावरच राहू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बदली होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करणारपक्षात काही बदलाचे वारे सुरू आहे, हे मला माहीत नाही. मात्र, बदली होणाऱ्या अधिकाऱ्याला बदल होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करायचे असते. मी बदलीच्या प्रतीक्षेत नाही, ज्यावेळी बदली होईल, त्यावेळी बघू असे सांगत तूर्तास प्रदेशाध्यक्षपद बदलणार नसल्याचे संकेत आमदार पाटील यांनी दिले.सहपालकमंत्रिपदाला अर्थ नाहीशक्तीपीठ महामार्गात छोटे शेतकरी भरडले जाणार असल्याने महामार्गाला लोकांचा विरोध आहे. सहपालकमंत्री हे पदच नाही. भाजपचा आग्रह असल्याने ही पदे भरली असली तरी त्याला काही अर्थ नसल्याचा टोला पाटील यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुतीBJPभाजपा