शासकीय व निमशासकीय कार्यालयात दरवर्षी ७ सप्टेंबरला आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करावी, अशी मागणी राज्य जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे येथील प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, ब्रिटिशांच्याविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड नरवीर उमाजी नाईक यांनी केले. परंतु, अनेक शासकीय कार्यालयामध्ये त्यांचा फोटोदेखील लावण्यात आलेला नाही.
तरुण पिढीला त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती व प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा फोटो लावण्यात यावा व शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात, राज्य प्रवक्ते प्रवीण नाईक, जिल्हाध्यक्ष महादेव नाईक, माजी सभापती दयानंद पट्टणकुडी, अमोल नाईक, विजय पट्टणकुडी, सुभाष नाईक यांचा समावेश होता.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन महादेव नाईक यांनी निवेदन दिले. या वेळी माजी उपसभापती दयानंद पट्टणकुडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रमांक : ०१०९२०२१-गड-०६