शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढल्याने रक्ताची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:53 AM

BloodBank Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आणि नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देडेंग्यू, मलेरियाने डोके वर काढल्याने रक्ताची गरज नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढले : रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आणि नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नियोजित शस्त्रक्रिया प्रलंबित राहिल्या होत्या. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये गर्दी होत आहे. कॅन्सर, हाडाचे आजार, प्रसूती, अपघातामुळे रुग्ण वाढले असून आता हॉस्पिटलमधून रक्ताची मागणी होऊ लागली आहे. त्यात कोरोनामुळे रक्तदात्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने सध्या सगळीकडे रक्ताची टंचाई भासत आहे. यासाठी आता रक्तदानाची गरज असून रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.कधी रक्तदान करावे

  • कोरोना प्रतिबंध लसीकरणानंतर चौदा दिवसांनंतर
  • कोरोनातून बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी
  • पुरुषांनी दर तीन महिन्याला
  • महिलांनी दर चार महिन्याला 

शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि रक्तदानमानवी शरीरात (१८ ते ६५ वयोगटातील व ४५ किलोपेक्षा अधिक वजन) ५ ते ६ लिटर रक्त असते. त्यातील ५ टक्के म्हणजेच ३५० ते ४५० मिली रक्त एका वेळी घेतले आहे.महिलांचे रक्तदानाचे प्रमाण ७ टक्केरक्तदानाची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर देशात ७ टक्केच महिला रक्तदान करतात. रक्तदानाची मानसिकता असते. मात्र, फास्ट फूडचे सेवन, सकस आहार व व्यायामाचा अभाव, अनियमित मासिक पाळीमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण खूप कमी असते.जिल्ह्यात २५० थॅलेस्मियाचे रुग्णथॅलेस्मिया, डायलेसिस रुग्णांना महिन्याला रक्त द्यावे लागते. जिल्ह्यात २५० हून अधिक ह्यथॅलेस्मियाह्णचे रुग्ण असल्याने त्यांना मोफत रक्तपुरवठा करावा लागतो.जून महिन्यात एक हजार प्लेटलेटची मागणीयंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने सुरुवात केली होती. त्यात ऊन-पावसामुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले. जून महिन्यात जिल्ह्यात एक हजार प्लेटलेटची मागणी विविध रक्तपेढ्यांतून झाली.

लोकमतने नेहमीच सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबवले. सध्या रक्ताची टंचाई ओळखून राज्यभर रक्तदानाची मोहीम राबवण्याचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.- प्रकाश घुंगूरकर ,अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशन

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूर