शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

नेत्याच्या विजयातील मैलाचा दगड होण्याचीच अभिलाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:24 AM

क धी चिरमुरे-फुटाणे, कार्यकर्त्यांच्या घरी गेल्यानंतर कधी शेंगा-गूळ, तर कधी पिठलं-भात खाऊन, तर कधी अर्धपोटीच प्रचारात तळमळीने दंग होत ...

क धी चिरमुरे-फुटाणे, कार्यकर्त्यांच्या घरी गेल्यानंतर कधी शेंगा-गूळ, तर कधी पिठलं-भात खाऊन, तर कधी अर्धपोटीच प्रचारात तळमळीने दंग होत असत. नेता व कार्यकर्ता यांच्यातील नातेच मुळात निष्ठेचे, प्रामाणिक आणि विश्वासार्ह होते. नेत्याच्या विजयातील मैलाचा दगड होण्याच्या इराद्याने प्रचंड ईर्ष्येने प्रत्येकजण आपापल्या नेत्याच्या प्रचारात सहभागी होत.दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचे आम्ही साक्षीदार आहोत. १९६० पासून त्यांच्या सोबत ऐन तारुण्यातील युवक अत्यंत निष्ठेने आणि निरपेक्ष भावनेने एका होतकरू कार्यकर्त्याला राजकारणातील हिंदकेसरी करण्यासाठी हिरीरिने सहभागी झाले होते.भाडोत्री सायकल घेऊन, सायकललीला झेंडे लावून प्रचार केला. या सायकलीचे तासी चार आणे भाडेही कार्यकर्ते पदरमोड करून देत असत. बानगेतून सोनगेत जाण्यासाठी नावेतून पलीकडे जावे लागे, तर कागल किंवा मुरगूड येथील प्रचारसभेला बैलगाडीतून जात असत. तसेच निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच चुना भिजवून घरांच्या भिंती रंगवायच्या आणि निळ भिजवून एका कोपऱ्यात आपल्या नेत्याचे नाव लिहून ठेवायचे, तर निवडणूक जाहीर होताच या आरक्षित जागेवर चिन्ह व नाव टाकायचे. रात्री उशिरापर्यंत सभा चालायच्या. आपल्या नेत्याच्या सभेसाठी रात्री दोन वाजेपर्यंत वाट पाहत बसलेले कार्यकर्ते आठवतात.तब्बल ५० वर्षे आम्ही स्व. मंडलिक यांच्यासोबत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्यरत राहिलो. आजही ठामपणे सांगू इच्छितो की, राजकारणातून दहा रुपयाचाही लाभ घेतलेला नाही.मात्र, स्व. मंडलिक हे राजकारणाचा लाभ समाजहितासाठी करणार असा आम्हा सर्वांचा आत्मविश्वास होता. म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या विजयासाठी जंग-जंग पछाडत होतो.आजच्या तरुणांनीही यातून बोध घ्यायला हवा. केवळ ढाब्यावर जेवण, सभेसाठी आलिशान गाड्या दिल्यानंतर विरून जाऊ नये. तसेच, तकलादू आमिषाला बळी न पडता शाश्वत विकासाचा विचार करावा. आपले आजचे मत आणि नेतृत्वाची निवड ही भावी पिढीला सुजलाम् सुफलाम् करणारी ठरावी इतकीच अपेक्षा.तानाजी पाटील, बंदुके, बानगे, ता. कागल