शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Kolhapur News: ना राहण्याची, ना जेवणाची सोय, जोतिबा डोंगरावर मोठी दुरावस्था; विकासाचं चांगभलंच

By इंदुमती सूर्यवंशी | Published: February 07, 2023 12:59 PM

भाविक-पर्यटकांची संख्या जास्त. त्यांची सोय कशी होणार, याचा विचार नाही.

इंदुमती गणेशकोल्हापूर : जोतिबा डोंगरावर आलेल्या भाविकांची ना राहण्याची सोय आहे, ना अंघोळीची, ना अन्नछत्राची. डोंगरावरची नवराई जितकी नजरेत भरते, त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात डोंगरावर विखुरलेला कचरा, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छता, घाण पाण्याने वाहणारे गटर्स डोळ्यांना खुपते. एवढे मोठे देवस्थान पण सेवा सुविधा आणि स्वच्छतेच्या नावाने चांगभलंच म्हणायची अवस्था आहे.अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह नाही, एवढी ओरड होते; परंतु त्याहून वाईट स्थिती जोतिबा डोंगरावर आहे. जोतिबा डोंगरावर भाविकांना सर्वात आधी स्वच्छतागृहाचा शोध घ्यावा लागतो. तेथे फक्त दोन सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू आहेत एक स्वच्छतागृह कुलूपबंद आहे. दूरगावहून आलेल्या भक्तांसाठी येथे अंघोळीची सोय नाही. डोंगरावर नाष्टा मिळतो; पण जेवणाची आबाळ होते. अन्नछत्र नसल्याने सोबत जेवण घेऊन यावे लागते. किंवा कोल्हापुरात येऊन जेवावे लागते. एवढेच काय पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाणी हवे असेल तर बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते.डोंगरावर कमालीची अस्वच्छता आहे, त्याची सुरुवात पार्किंग आणि मुख्य रस्त्यापासूनच होते. नजर जाईल तिथे फक्त विखुरलेला कचरा आणि जागा मिळेल तिथे कचऱ्याचे ढीग एवढेच दिसते. ही अवस्था पूर्ण डोंगरावर आहे. ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी ट्रॉल्या ठेवल्या आहेत; पण ट्रॉल्या रिकाम्या आणि कचरा रस्त्यावर आहे. घनकचरा व्यवस्थापन तर नावालाही नाही. गटर्स सिस्टीम चुकीच्या पद्धतीने केल्याने गटर तुंबलेले असतात. गल्ली बोळांमधून सांडपाणी वाहत असते. ड्रेनेज सिस्टीम नसल्याने गावचे घाण पाणी डोंगरावरून खाली पडत असते. वाऱ्याच्या माऱ्यामुळे हे पाणी उलटे येऊन मंदिराच्या शिखरावर आदळते. हा प्रकार मंदिराची पवित्रता भंग करणारा असून, त्याबद्दल गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.पर्यटकांचे काय?डोंगरावर परंपरेनेच येणारे भाविक जास्त आहेत, ते ठरलेल्या पुजाऱ्यांच्याच घरी राहतात. दक्षिणा, शिधा देऊन तिथेच जेवतात, त्यामुळे अन्नछत्राची आणि यात्री निवासाची गरज नाही, अशी पाठराखण येथे केली जाते; पण डोंगरावर ७००-८०० घरे आहेत. एकावेळी एका घरात किती माणसांची सोय होते, याला मर्यादा आहेत. रोज हजारो पर्यटक-भाविक येतात. त्यांना पुजाऱ्यांची ओळख नसते. गुरवांकडे राहणाऱ्या भाविकांपेक्षा अशा भाविक-पर्यटकांची संख्या जास्त आहे. त्यांची सोय कशी होणार, याचा विचार केला जात नाही.

सेंट्रल प्लाझा अन् दुकानगाळ्यांची कचराकुंडीआराखड्यांतर्गत १९९१ साली बांधलेल्या सेंट्रल प्लाझामध्ये मोठमोठी झाडी उगवल्याने दगडी बांधकाम दिसत नाही. सगळीकडे कचऱ्याचे ढीग आहेत. पार्किंगमध्ये चुकीच्या पद्धतीने बांधलेले ३५ हून अधिक दुकानगाळे बंद व दुरवस्थेत आहेत. ज्या दोन कामांसाठी त्याकाळी लाखोंचा निधी खर्ची पडला तो शब्दश: पाण्यात गेला आहे.

सगळी कामं अर्धवटच२०१७ मध्ये आलेल्या अडीच कोटींत जिल्हा परिषदेने सासनकाठ्यांना अडथळा होऊ नये म्हणून भूमिगत विद्युत व्यवस्था केली. डोंगरावरील मुख्य रस्ता आणि ठाकरे मिटके गल्ली या दोनच ठिकाणी हे काम झाले आहे, तेथेही पूर्वीचे लाईटचे खांब, वायरिंगच काढलेले नाही. त्यामुळे सासनकाठी मार्गावर होता तसा अडथळा कायम आहे. पार्किंगच्या जागेत दर्शनी भागातच महिला व पुरुषांसाठी दोन मजली स्वतंत्र स्वच्छतागृह बांधले. अख्खी इमारत तयार झाली; पण ड्रेनेज सिस्टीम केलेली नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा