शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

ईडीच्या चौकशीनंतर भ्रष्टाचाराच्या पैशासह पळून गेले, उत्तमराव जानकरांचा मंत्री मुश्रीफांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 5:57 PM

कोल्हापूर : कोल्हापूर , कागलची भूमी लढाऊ आहे. समतेची भूमी आहे. या भूमीतील नेत्यांना पवार यांनी सर्व काही दिले. ...

कोल्हापूर : कोल्हापूर, कागलची भूमी लढाऊ आहे. समतेची भूमी आहे. या भूमीतील नेत्यांना पवार यांनी सर्व काही दिले. गोकुळ, केडीसीसी बँक दिली. काजू, बदाम बुट्टीने दिले. गांधीनगरमधून पाच मीटर शर्टाचे कापडही दिले. तरीही ईडीची चौकशी सुरू झाल्यानंतर भ्रष्टाचाराच्या पैशासह ते पळून गेले, अशी बोचरी टीका धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी मंगळवारी गैबी चौकातील सभेत केली.जानकर म्हणाले, काही दिवसांपूर्वी राज्यात राजकीय घडामोडींमध्ये जंगलाला आग लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली. पवार यांना अनेक जण सोडून गेले. बिबट्याही गेला. त्यांच्या मागून तुमच्या (कागल) मतदारसंघातील आमदारही गेला.

जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, गद्दारी करून बाहेर गेलेल्यांनी यापूर्वी शरद पवार यांची अनेकांना भेट होऊ दिली नाही. कोण भेटते याची पाळत ठेवण्यासाठी लोक नेमले होते. भ्रष्टाचाराच्या जोरावर त्यांनी कुपेकर, माने, खानविलकर, नरसिंगराव पाटील अशा बहुजन नेत्यांची घराणी राजकारणातून संपविण्याचे काम केले. आता कागलमध्ये परिवर्तनाची लढाई सुरू झाली आहे.तालुकाध्यक्ष शिवानंद माळी म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे २५ वर्षे आमदार झाले. मंत्री झाले. मात्र, ते स्वार्थासाठी बाजूला गेले. समरजीत घाटगे यांनीही दहा वर्षे आमदार झाल्यानंतर दिल्ली गाठावी. आमदार म्हणून दुसऱ्याला संधी द्यावी. राजेंद्र जाधव, अभिजित कांबळे, विश्वास देशमुख, रमीज मुजावर, सागर कोंडकर, यशवंत गोसावी यांची भाषणे झाली.

कम्पिल्ट घाबरलंय..सभेच्या ठिकाणी ‘घाबरलंय घाबरलंय.. कम्पिल्ट घाबरलंय’, ‘नको ईडी, नको गद्दार, आता समरजीतराजेच आमदार’, ‘गाडू या मंत्र्यांची गद्दारी, वाजवू या समरजीतराजेंची तुतारी’, ‘बदल हवा तर आमदार नवा’, ‘लय झाला हुकूमशाहीचा कारभार, आमदार होणार शाहूंचा वारसदार..’ अशा घोषणांचे फलक घेऊन महिला, कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले.

बालेकिल्ल्यात तोफ डागली..कागलमधील गैबी चौक हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला. त्यांना निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वीच्या अनेक सभा गाजवल्या. मात्र, आता मुश्रीफ यांच्या पराभवासाठी पवार यांनी गैबी चौकच निवडला. त्यांनी मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांच्यावर जोरदार तोफ डागली. त्यांच्या भाषणात मुश्रीफ यांचा संदर्भ येताच प्रेक्षकांतून प्रचंड दाद मिळत राहिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफ