शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटीच्या योगायोगाची चर्चा, पण ठरवून झालेल्या भेटीची मात्र नाही, वाचा सविस्तर
2
राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला; ७ लाख कोटींच्या वर गेला आकडा   
3
विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा; उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारकडे मागणी
4
विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! कोणतीच परीक्षा 'नीट' नाही
5
पाहुण्या दक्षिण आफ्रकेची 'कसोटी'! आजपासून INDW vs SAW एकमेव सामन्याचा थरार
6
घोटाळा ‘क्वांट’चा; फटका ‘क्वांटम’ला; ‘तो मी नव्हेच’ असे म्हणायची कंपनीवर वेळ
7
India in Final : 'बापू'समोर इंग्लंडने गुडघे टेकले! फिरकीपटूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवले 
8
आजचा अग्रलेख : नेमेचि होतो घोळ!
9
डेंग्यूचा डंख! वर्षभरात राज्यात ५५ जणांचा मृत्यू; आर्थिक पाहणीत आरोग्याची स्थिती उघड
10
जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज - कपिल देव 
11
देशात एकच प्रत्यक्ष, तीही जुनी करप्रणाली आवश्यक 
12
“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलत असतील तर आम्ही शांत राहायचे का”; अमोल मिटकरी संतापले
13
पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळणार? भाजपाकडून चाचपणी सुरू, ११ जणांची नावे चर्चेत
14
संपूर्ण देशात धावणार बुलेट ट्रेन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती, कशी असेल योजना? 
15
मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक
16
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून संजय राऊतांनी पुढे केलं उद्धव ठाकरेंचं नाव, नाना पटोले म्हणाले... 
17
“भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार
18
जिओच्या ग्राहकांवर संक्रांत! मोठी दरवाढ, अनलिमिटेड 5G साठी २३९ नाही, ३४९ रुपये मोजावे लागणार
19
मरीनड्राइव्ह महिला बुडताना दिसली; दोन पोलिसांनी उधाणलेल्या समुद्रात उड्या घेतल्या, वाचविले
20
विधानसभेला मविआकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? जयंत पाटलांचे सकारात्मक भाष्य!

Gokul Election Result: गोकुळची निवडणूक झाल्यावर कोरोना आठवला का?, समाजमाध्यमातून नेत्यांवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 6:55 PM

CoronaVirus Updates Kolhapur : गेले महिनाभर कोरोनाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला असताना राजकारण्यांना गोकुळची निवडणूक महत्त्वाची होती, ती संपल्यावर यांना कोरोना आठवला का, जीवनावश्यक अशी गोकुळची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापुरात कडक बंद, पीपीई कीट घालून मतदान होत असेल तर नागरिकांना कीट घालून व्यवसाय करू द्या., कोल्हापुरातील राजकारण्यांचा जाहीर निषेध, अशा शब्दांत राजकीय नेत्यांवर जहरी टीका करत कोल्हापूरकरांनी समाजमाध्यमांवर आपला संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देगोकुळची निवडणूक झाल्यावर कोरोना आठवला का?समाजमाध्यमातून नेत्यांवर जहरी टीका

इंदुमती गणेश 

कोल्हापूर : गेले महिनाभर कोरोनाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला असताना राजकारण्यांना 'गोकुळ'ची निवडणूक महत्त्वाची होती, ती संपल्यावर यांना कोरोना आठवला का, जीवनावश्यक अशी गोकुळची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापुरात कडक बंद, पीपीई कीट घालून मतदान होत असेल तर नागरिकांना कीट घालून व्यवसाय करू द्या., कोल्हापुरातील राजकारण्यांचा जाहीर निषेध, अशा शब्दांत राजकीय नेत्यांवर जहरी टीका करत कोल्हापूरकरांनी समाजमाध्यमांवर आपला संताप व्यक्त केला आहे.गेले महिनाभर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. मात्र, त्या काळातही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन ह्यगोकुळह्णची निवडणूक लढवली गेली. याकाळात तालुक्यांमध्ये प्रचार मेळावे घेतले गेले, त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत होते, काही ठरावधारकांचा कोरोनाचे मृत्यूदेखील झाला.

हे सगळं सुरू असतानााही गोकुळची निवडणूक पुढे ढकलली गेली नाही. उलट कोरोनाच्या सगळ्या निर्बंधांना पायदळी तुडवत ही निवडणूक पार पाडली गेली आणि मंगळवारी मतमोजणी सुरू झाली की राजकीय नेत्यांनी तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. या प्रकारावर समाजमाध्यमांद्वारे नागरिकांनी संताप व्यक्त केला.कोरोनाचा प्रकोप सुरू असताना राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते गोकुळ निवडणुकीच्या राजकारणात मग्न होते. या लोकांनी स्वतःचे आर्थिक व राजकीय हित साधण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडले. रेमडेसिविर इंजेक्शन, कोरोना लस, ऑक्सिजन बेडची सोय याचा आढावा एकाही राजकारण्याने घेतला नाही. तुमच्या नादाला लागून कोणाचे हित झाले नाही म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून रोजीरोटी मिळविण्याचा प्रयत्न करत होतो, ते पण तुम्ही लॉकडाऊन करून मोडून पाडत आहात. आता आमच्यासमोर मरण आहेच फक्त कोरोनाने मरायचे, उपाशीपोटी मरायचे की हार्ट अटॅकने मरायचे एवढेच बाकी आहे. तुमची घराणेशाही, सत्तेची आणि पैशांची भूक भस्म्यारोगा सारखीच आहे. अशा शब्दांत राजकीय नेत्यांवर टीका करण्यात आली आहे.समाजमाध्यमावरील संदेश

>> काल गोकुळात रंग खेळले हरी, नागरिका आता जपून रहा तुझ्या घरी, नाही तर जाशील देवाघरी

>> गोकुळ लयच मोठं हाय की राव! आयपीएल पण इलेक्शन झाल्यावर रद्द केली.

>> पाऊस पण गोकुळच्या इलेक्शनसाठी थांबला होता की का?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडिया