शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

पदाधिकारी निवडीवेळी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:17 AM

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर सभागृहामध्ये अधिकारी का आले नाहीत, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजवर्धन निंबाळकर ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर सभागृहामध्ये अधिकारी का आले नाहीत, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजवर्धन निंबाळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही हा विषय गांभीर्यांने घेतला असून, याबाबत त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्याकडे विचारणा केली आहे.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर एकदा का पीठासन अधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण करून निघून गेले की, त्यानंतर जिल्हा परिषदेचे अधिकारी सभागृहात येतात आणि नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतात, अशी पद्धत आहे. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नंतरच्या सभापती निवडीवेळीही अधिकारी उपस्थित नसल्याने भाजपचे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

सोमवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. त्यांनी नूतन अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे अभिनंदन केले. परंतु सभागृहातील निवड प्रक्रिया संपली आहे, असा निरोपच न गेल्याने अन्य खाते प्रमुख सभागृहात आलेच नाहीत. यातील अनेक अधिकारी जवळपास थांबून होते; परंतु माहिती न मिळाल्याने सर्वजण बाहेर थांबले.

मंगळवारीही हाच प्रकार घडला. खुद्द चव्हाण हे निवड प्रक्रिया झाली की सभागृहात येऊन नूतन चारही सभापतींचे अभिनंद करणार होते. त्यासाठी ते निरोपाच्या प्रतीक्षेत होते. परंतु निवड झाल्याचा त्यांना निरोपच मिळाला नाही. ते जिल्हा परिषदेत येईपर्यंत निवडी होऊन, भाषणेही झाली. जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारात गर्दीतच मग चव्हाण यांनी या चारही पदाधिकाऱ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. याबाबत त्यांनी मनीषा देसाई यांच्याकडे चौकशी केली. मी तुमच्या निरोपाची वाट पाहत होतो. तो वेळेत दिला असता तर सभागृहातच अभिनंदन करता आले असते, असे ते म्हणाले. या वेळी सामान्य प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तसा प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात निरोप दिला असल्याचे देसाई यांनी सांगितले. तसेच निवड प्रक्रिया सुरू असताना अन्य अधिकारी सभागृहात उपस्थित नसतात, असेही त्या म्हणाल्या.

चौकट

अधिकाऱ्यांची धावाधाव

सभागृहातच नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करता न आल्याने मग नंतरच्या तासाभरात आपापल्या समित्यांच्या सभापतींचे अभिनंदन करताना अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. सभापती नेमके कुठे आहेत अशी विचारणा करून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अधिकारी पोहोचले.