शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

सातारा बसस्थानकात संतप्त प्रवाशांकडून तोडफोड

By admin | Published: September 17, 2015 11:36 PM

परस्परविरोधी तक्रारी : सहायक वाहतूक निरीक्षकांनी फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप

सातारा : मुंबई-आजरा प्रवासात इंजिनातील बिघाडामुळे एक ना दोन, तब्बल चार गाड्या बदलाव्या लागल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी येथील मध्यवर्ती बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षाची तोडफोड केली. प्रवास सुरू असताना सहायक वाहतूक निरीक्षकांना अनेकदा फोन करूनही त्यांनी तो घेतला नाही आणि नंतर स्वत: फोन करून शिवीगाळ केली, असा आरोप प्रवाशांनी केला. यासंदर्भात प्रवाशांनी, तर तोडफोडप्रकरणी एस.टी. प्रशासनाने चार प्रवाशांविरुद्ध तक्रार दाखल केली.प्रवासी, एस.टी.चे अधिकारी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकावर ही घटना घडली. वाहतूक नियंत्रण कक्षाच्या काचा प्रवाशांनी फोडल्या. आतील संगणक, दोन माईक आणि फोनचेही नुकसान केले. यावेळी झालेला आरडाओरडा आणि गोंधळामुळे बसस्थानकावरील इतर प्रवाशांबरोबरच एस.टी.चे कर्मचारीही प्रचंड घाबरले. सुमारे तासभर तणावपूर्ण वातावरण होते. त्यानंतर एस.टी. प्रशासनाने शिवाजी यशवंत बोरवडकर (वय ३५, रा. माद्याळ, ता. कागल, जि. कोल्हापूर), संदीप मारुती बिवळेकर (३५, रा. झुलपेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर), संजय नारायण देवलकर (४२, रा. चाफवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर), आणि श्रीपती महादेव राजगोळे (५२, रा. न्यू पनवेल, जि. रायगड) या चार प्रवाशांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना समज दिली. ‘यापुढे कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल,’ अशी नोटीस चौघांना बजावल्यानंतर दुपारी एक वाजून एक मिनिटांनी प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू झाला.दरम्यान, एकापाठोपाठ एक अशा चार बस नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांपैकी श्रीपती महादेव राजगोळे यांनी सहायक वाहतूक निरीक्षक जी. बी. किरते यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. तथापि, तब्बल ३० वेळा फोन करूनही त्यांनी तो उचलला नाही, असे राजगोळे यांनी सांगितले. नंतर किरते यांनीच राजगोळे यांना उलटा फोन केला. तेव्हा झालेल्या बाचाबाचीत किरते यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप राजगोळे यांनी केला आहे. राजगोळे हे मुंबईत ‘बीईएसटी’मध्ये चालक म्हणून काम करतात. किरते यांच्याविरुद्ध त्यांनी शहर पोलीस ठाण्यात शिवीगाळीची तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी) आजरा-मुंबई...मुंबई-आजराआजरा-मुंबई बस मंगळवारी रात्री जेवणासाठी नागठाण्याजवळील ढाब्यावर थांबली असता, सशस्त्र दरोडेखोरांनी कुरिअरच्या कर्मचाऱ्याला धाक दाखवून सुमारे ३४ लाख रुपयांची लूट केली होती. दुसऱ्याच दिवशी नेमक्या मुंबई-आजरा बसलाच ‘ठेचेवर ठेच’ लागली आणि त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई-आजरा मार्गावरील धावत्या बसवर हे सलग दुसरे ‘विघ्न’ नेमके विघ्नहर्त्याच्या आगमनावेळीच आले.आजरा-मुंबई...मुंबई-आजराआजरा-मुंबई बस मंगळवारी रात्री जेवणासाठी नागठाण्याजवळील ढाब्यावर थांबली असता, सशस्त्र दरोडेखोरांनी कुरिअरच्या कर्मचाऱ्याला धाक दाखवून सुमारे ३४ लाख रुपयांची लूट केली होती. दुसऱ्याच दिवशी नेमक्या मुंबई-आजरा बसलाच ‘ठेचेवर ठेच’ लागली आणि त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई-आजरा मार्गावरील धावत्या बसवर हे सलग दुसरे ‘विघ्न’ नेमके विघ्नहर्त्याच्या आगमनावेळीच आले.