शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
3
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
4
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
5
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
6
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
7
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
8
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
9
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
10
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
11
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
12
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
13
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
14
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
15
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
16
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
17
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
18
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
19
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
20
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

जि. प. पदाधिकारी मुदतवाढीबद्दल आशावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:43 AM

कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँक आणि राजाराम साखर कारखान्याची निवडणूक कधीही जाहीर होण्याची ...

कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँक आणि राजाराम साखर कारखान्याची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आपल्याला पुन्हा मुदतवाढ मिळेल यासाठी प्रचंड आशावादी आहेत. या सर्व परिस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या सहाही पदाधिकाऱ्यांना वर्ष होऊन गेल्यामुळे त्यांना बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याचे सूतोवाच केले होते. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील परदेशातून आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, याच दरम्यान तीनही मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या निवडणुका जाहीर झाल्या.

सतेज पाटील यांच्यासाठी गोकुळ आणि राजाराम कारखाना या दोन निवडणुका अतिमहत्त्वाच्या आहेत. हसन मुश्रीफ यांच्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक महत्त्वाची आहे. याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे राजीनामे घेणे, ते मंजूर होणे, मग शिवसेना आणि स्वाभिमानीच्या सभापतींचे राजीनामे घेणे, नव्या निवडीची नावे निश्चित करणे आणि सर्व सदस्यांना एकत्र ठेवत पुन्हा सत्ता स्थापन करणे यासाठी या दोन्ही नेत्यांना वेळ द्यावा लागणार आहे.

अशातच गोकुळ आणि जिल्हा बँकेसाठी इच्छुक असणारेही जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींना वेगवेगळे संदर्भ आहेत. निधी वाटपावरून काही सदस्य नाराज आहेत. या सगळ्याचा फायदा विरोधी गटाला होऊ नये यासाठी पदाधिकारी बदल या निवडणुका झाल्यानंतर होईल असा आशावाद या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

गेल्या निवडीवेळीही गोव्यातून आमदार पी. एन. पाटील गटाचे सदस्य परत कोल्हापुरात आल्यामुळे खळबळ उडाली होती. एकीकडे आमदार पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व असलेल्या गोकुळ विरोधात पालकमंत्री पाटील यांनी उघड आघाडी उघडली असल्याने या संघर्षाला वेगळी धार येणार आहे.

चौकट

पी. एन. यांच्या मागणीने गुंता वाढला

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आमदार पी. एन. पाटील यांनी भेट घेऊन राहुल यांना अध्यक्ष करण्याची मागणी केल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आधीच्या अध्यक्षांचा राजीनामा होण्याआधी राहुल यांच्यासाठी पवार यांच्याकडे शब्द टाकण्यातून पी. एन. पाटील यांनी काही प्रश्न निर्माण करून ठेवल्याचे मानले जाते. बदल केल्यानंतर काँग्रेेसकडेच अध्यक्षपद ठेवायचे असेल तर राहुल पाटील यांनाच हे पद द्यावे लागेल. कारण पी. एन. यांचे राज्यपातळीवर तेवढे वजन आहे. त्यापेक्षा आहे तेच पदाधिकारी ठेवण्याकडे नेत्यांचा कल राहू शकतो.