शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
2
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
3
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
4
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
5
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
6
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
7
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
8
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
9
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
10
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?
11
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
13
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
14
कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन
15
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
16
'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर...
17
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
18
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
19
Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)
20
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात

जिल्हा बँक पुन्हा तोट्यात

By admin | Published: September 17, 2015 1:12 AM

उत्पन्नापेक्षा खर्चच जादा : संचित तोटाही वाढला

राजाराम लोंढे / कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१४-१५ या आर्थिक वर्षात ८ कोटी ४४ लाखांचा तोटा झाला आहे. उत्पन्नापेक्षा बँकेचा खर्च अधिक झाला, त्याचबरोबर ‘एनपीए’मध्ये असणाऱ्या खात्यांमध्ये फिरवाफिरवी करता आली नसल्यानेच त्याचा परिणाम ताळेबंदावर दिसत आहे. बँकेकडून एकूण कर्ज वाटपाच्या ५२ टक्के पीक कर्जाचे वाटप होते, हे जरी खरे असले तरी व्याज खर्च, न्यायालयीन खर्चासह इतर खर्चांत झालेल्या वाढीमुळे तोटा झाला आहे. जिल्ह्याची अर्थवाहिनी २००६ पासून कमकुवत होत गेली. प्रशासकांनी बँकेला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, ‘दत्त-आसुर्ले’वगळता बड्या थकबाकीदारांकडून वसूल करण्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यामुळे बँकेचा ताळेबंद सुदृढ होण्यावर मर्यादा आल्या. २०११-१२ ला ७९६ कोटी निव्वळ नफा ताळेबंदात दिसत आहे. या आर्थिक वर्षात ११२ कोटी अपात्र कर्जमाफी जमा-खर्चाबरोबर लहान थकबाकीदारांकडून वसुलीही चांगली झाली होती. २०१२-१३ ला ‘दत्त-आसुर्ले’ची विक्री झाल्याने या आर्थिक वर्षात १४६ कोटी नफा दिसतो. २०१३-१४ ला कर्जाचे हप्ते पाडून दिल्याने हा नफा ९ कोटींवर आला. २०१४-१५ मात्र बँकेची खरी आर्थिक स्थिती समोर आली. या आर्थिक वर्षात ८ कोटी ४४ लाखांचा तोटा ताळेबंदाला दिसतो. गतवर्षीच्या तुलनेत व्याज खर्चात २३ कोटी, वकील फीमध्ये ११ लाख, छपाई, सादिलवारमध्ये ५ लाख, व्याज सवलतमध्ये ५ लाख, तर संशयित बुडीत कर्जनिधीमध्ये १ कोटी १९ लाखाने वाढ झाली आहे.