शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

कर्ज पुरवठा करताना जिल्हा बँकेने नाबार्ड तत्त्वप्रणालीचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:16 AM

माणगाव : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची आपली बँक म्हणून ओळखली जाते. मात्र, बँकेचे नियम आणि ...

माणगाव : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची आपली बँक म्हणून ओळखली जाते. मात्र, बँकेचे नियम आणि जाचक अटी बघितल्यानंतर, कर्ज प्रकरणे शेतकऱ्यांना नकोशी वाटू लागली आहेत. त्यामुळे गावा-गावातील सेवा संस्था अडचणीत आल्या आहेत. बँकेची स्थापना ही नफा मिळविण्यासाठी नसून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी आहे. बँकेने नियम व अटी सुधाराव्यात आणि शेतकऱ्यांना पीककर्ज धोरणात सवलती द्याव्यात, अशी मागणी हेरे (ता. चंदगड) येथील सेवा संस्थेचे अध्यक्ष महादेव प्रसादे यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रसादे म्हणाले, जिल्हा बँक व सहकारी सेवा संस्थांची नाळ कर्ज प्रकरणावरून जुळली असताना, ती आता वेगळ्या वाटेने वाटचाल करीत आहे. ई-करार बोजानुसार २ लाखाचे कर्ज उपलब्ध करण्यासाठी ४ लाखाचा बोजा पाहिजे, हे धोरण चुकीचे आहे. त्यामुळे इ- कराराचे बंधन लादू नये. तसेच खावटी कर्जाचा व्याज दर कमी करावा, एखाद्या सेवा संस्थेचे क्रेडिट कमी करणे, भागभांडवलामध्ये नफा धरणे, भागभांडवलामध्ये नफा व ठेवी धरल्यामुळे नफा कमी होतो. त्यामुळे नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शेतकऱ्यांना कर्ज दिले गेले पाहिजे, या प्रमुख तत्त्वाचा बँकेला विसर पडला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. इ-खावटीला प्रोत्साहन आणि पीक कर्जाला काटछाट, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. पीक कर्जाला जेवढी मंजुरी तितका कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी प्रसादे यांनी केली.