शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

जिल्हा बँकेच्या जाचक अटींचा शेतक-यांना फटकाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:31 AM

चंदगड : जिल्हा बँकेच्या जाचक अटींचा फटका सर्वसामान्य शेतकºयांचा बसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असून जिल्हा बँकेच्या ...

चंदगड : जिल्हा बँकेच्या जाचक अटींचा फटका सर्वसामान्य शेतकºयांचा बसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असून जिल्हा बँकेच्या नादाला लागण्यापेक्षा राष्ट्रीयकृत बँकेचा आधार घेण्याचा प्रयत्न त्याने चालविल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

शेतक-यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा बँकेची निर्मिती झाली. शेतकरी व बँक यांच्यातील दुवा म्हणून गावोगावी सोसायट्या स्थापन करण्यात आल्या.

सुरुवातीला या माध्यमातून शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध होते आणि याचा उपयोग करून शेतकरी आपल्या अडीअडचणींवर मात करत होता. मात्र, अलिकडील काळात सरकारच्या धोरणामुळे जिल्हा बँकेने कर्जाचे निकष बदलले आहेत. याचा नाहक त्रास शेतक-यांना होत आहे.

पीक कर्ज ६ टक्के व्याजदराने मिळत होते. मात्र, बँकेने आता खावटी कर्जाचे घोडे दामटून शेतक-यांना मेटाकुटीला आणले आहे. तसेच त्याचा व्याजदरही १५ टक्के इतका जास्त असल्याने ते कर्ज घ्यायचे की राष्ट्रीय बँकेचा पर्याय स्वीकारावा या द्विधा मन:स्थितीत शेतकरी गुरफटला आहे.

प्रतिक्रिया

सोसायटीचे कर्ज फेडण्यासाठी उसनवारी पैसे घेतले आहेत. पण सोसायटीकडून पूर्वी इतकीही रक्कम मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे आमचे तर कायच झाले नाही उलट घेतलेली उसनवारी फेडण्यासाठी अनेकांकडे हात पसरावे लागत आहेत.

- तानाजी बा. पाटील, प्रगतशील शेतकरी, तुर्केवाडी

चौकट :

जिल्हा बँकेने कर्जाचे निकष बदलले आहेत.

शेतक-यांना ते पटवून देताना सचिवांसह संचालकांची दमछाक होत आहे. अनेकवेळा वादाच्या प्रसंगाना त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एकतर खावटी कर्जाचा व्याजदर कमी करावा अन्यथा बदलेल्या निकषांमध्ये पुन्हा बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

तानाजी प. कागणकर, उपाध्यक्ष, तावरेवाडी सोसायटी.

चौकट :

खावटी कर्ज म्हणजे काय?

ऊसपीक कर्ज मर्यादा संपल्यानंतर कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी हे उपलब्ध केले जाते. बँकेपूर्वी ५० टक्के शेतकºयांना कर्ज देत होते. पण आता त्यामध्ये खावटी व आकस्मिक असे दोन प्रकार करून ३० खावटी व ते खर्च केल्यानंतरच कौटुंबीक खर्चासाठी २० टक्के मंजूर केले जात आहे.