शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १६ वरून १२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:12 IST

CoronaVirus In Kolhapur : चाचण्या वाढविल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत असली तरी मागील तीन आठवड्यांत कोल्हापुरातील कोरोना पॉझिटिव्ह रेट १६ वरून १२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर ६० वर्षांवरील लसीकरणात राज्यात कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १६ वरून १२ टक्क्यांवर६० वर्षांवरील लसीकरणात प्रथम : कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : चाचण्या वाढविल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत असली तरी मागील तीन आठवड्यांत कोल्हापुरातील कोरोना पॉझिटिव्ह रेट १६ वरून १२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर ६० वर्षांवरील लसीकरणात राज्यात कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे.

नागरिकांनी दुसरा डोस घेऊन काही कालावधी जाईपर्यंत व जिल्ह्यातील लसीकरण ८० टक्क्यांपर्यंत जाईपर्यंत कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी केली.कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.डॉ. बलकवडे म्हणाल्या, चाचण्या वाढविल्या असल्या तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट आता कमी होत आहे. मागील आठवड्यात एक लाखावर चाचण्या करण्यात आल्या आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या ७५ हजार इतकी होती. या चाचण्यांमुळे लक्षणे नसलेल्यांमुळे किंवा सुपरस्प्रेडर ठरलेल्यांमुळे होणारा संसर्ग वाढण्यावर आळा बसणार आहे.८ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची कार्यवाहीकाही गावांमध्ये पाचवीपासूनचे वर्ग सुरू झाले असून, शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम आहे. याबाबत संजयसिंह चव्हाण म्हणाले, शासनाकडून दोन दिवसांत दोन आदेश आल्याने गोंधळ झाला असेल; मात्र जिल्हा परिषदेला ८ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश आले असून, त्याबाबत कार्यवाही केली जाईल.गृहविलगीकरण झाले कमीमागील महिन्यात झालेल्या बैठकीत राज्य शासनाने घरीच राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करा, गृहविलगीकरणाचे प्रमाण कमी करा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता शहरातील गृहविलगीकरण ६७ वरून ४८ टक्क्यांवर, तर ग्रामीण भागातील प्रमाण ६५ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर आणल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.करवीर, हातकणंगलेवर लक्ष केंद्रितजिल्ह्यातील करवीर व हातकणंगलेत रुग्णांची संख्या जास्त आहे. यावर संजयसिंह चव्हाण म्हणाले, करवीर कोल्हापूर शहराजवळ असल्याने नागरिकांची ये-जा सुरू असते. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजीत वस्त्रोद्योग व भोवतालच्या गावांमध्ये परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणात असल्याने या दोन्ही तालुक्यांत रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र, येथील हॉटस्पॉट ठरत असलेल्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्याचा प्रयत्न असेल. काही तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे, त्या तुलनेत पॉझिटिव्ह रेट ६ ते ९ टक्क्यांपर्यंत कमी आहे.कालावधी : आरटीपीसीआर चाचण्या : पॉझिटिव्ह रुग्ण : टक्केवारी

  • १७ ते २३ जून : २६ हजार ४६२ : ४ हजार १७९ : १५.७९
  • २४ ते ३० जून ३८ हजार ८४५ : ५ हजार ४६२ : १४.०६
  • १ ते ७ जुलै : ६० हजार ९५० : ७ हजार २३९ : ११.८८

 

१२७ गावे कोरोनामुक्त

तालुका : ग्रामपंचायती

  • आजरा : ३९
  • भुदरगड : ०
  • ग़डहिंग्लज : ३
  • गगनबावडा : २०
  • चंदगड : १३
  • हातकणंगले : ३
  • कागल : १०
  • करवीर : १७
  • पन्हाळा : ४
  • राधानगरी : ३
  • शाहुवाडी : १३
  • शिरोळ २

एकूण : १२७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर