शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

ऊस बिलातून पाणीपट्टी कपात नको

By admin | Published: December 13, 2015 11:44 PM

शेतकऱ्यांची मागणी : परवानगीशिवाय परस्पर वसुलीवर आक्षेप

सावरवाडी : सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस बिलातून सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या रकमेची वसुली केली जाते. मात्र, बऱ्याचवेळा या शेतकऱ्यांकडून जादा पाणीपट्टी वसूल केली जाते. या प्रकारामळे शेतकरीवर्गात नाराजी पसरली असून, शेतकऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय साखर कारखान्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टीच्या रकमा कपात करू नयेत, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व सहकारी विकास सेवा संस्था शेतकऱ्यांच्या पीककर्ज व पाणीपट्टीच्या रकमांच्या वसुलीसाठी साखर कारखान्याकडे वसुली पत्रक पाठविले जाते. या वसुली पत्रकातून जादा रकमा कळवून त्यांच्या पावत्या शेतकऱ्यांना दिल्या जात नाहीत. जादा रकमा कळवून भ्रष्टाचार होऊ लागला आहे. संस्थेच्या सचिवांच्या गैरकारभाराबाबत ऊस उत्पादक शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून लेखी परवानगीशिवाय कोणत्याही सहकारी संस्थांच्या रकमेची कपात करू नये, अशा लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत. पाणीपट्टी व कर्ज प्रकरण वसुलीतून जादा रकमा उचलून एकप्रकाराचा घोटाळाच होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यासाठीच सहकारी साखर कारखान्यांनी ऊस बिलांची रक्कम थेट सहकारी संस्थांना कपात करू देऊ नये, याचा साखर कारखान्यांनी निर्णय घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलातून जादा रक्कम उचल करण्याचा प्रकार घडू लागल्याने सहकारी संस्थांच्या कारभाराची चौकशी करण्याची गरज आहे. संस्था सचिवांनी शेतकऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय ऊस बिलातून कोणतीच कापत करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू.’’ - नामदेव पाटील, भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य.