शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

बोटीतून स्थलांतराची वाट बघू नका, कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीवरुन पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 12:49 IST

आजपासून स्थलांतर सुरू करण्याचे आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील पावसाचा जोर असाच राहिला तर राधानगरी, कुंभी, कासारी या तीन धरणातील पाण्याचा विसर्ग आज मंगळवारी सुरू होऊन पूर येण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे अजून २४ तास आणि याआधीच्या दोन पुरांचा अनुभव आहे, त्यामुळे विसर्ग सुरू झाल्यावर लोकांच्या दारात पूर येईपर्यंत वाट न बघता तातडीने आज, मंगळवारपासूनच नागरिकांचे स्थलांतर करा.

यंदा कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचे बोटीतून स्थलांतर होणार नाही. बोटी फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जातील.. अशी सक्त ताकीद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर यांनी सोमवारी कोल्हापूरसह जिल्ह्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी या पूरबाधित होणाऱ्या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदी उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर म्हणाले, आज मंगळवारी सायंकाळपर्यंत राधानगरीतील व त्यानंतर एका दिवसाने कुंभी कासारीतून विसर्ग सुरू होईल. यामुळे किमान ५ फुटांनी पाणी वाढून धोका पातळी ओलांडेल. आयत्या वेळी बोटीतून स्थलांतर करणे त्रासाचे होते व लोकांच्या जीवाला धोका असतो. जनावरांचा मृत्यू होतो. तशी वेळ येऊ नये यासाठी सोमवारी रात्रीपर्यंत पाणी खाली गेले नाही तर मंगळवारी स्थलांतर सुरू करा.

स्थलांतरासाठी बोटींचा वापर होणार नाही. नागरिकांची खासगी वाहने असतील. एसटी बसेसमधून स्थलांतर करा. त्यासाठी ठिकाणानुसार जबाबदारी निश्चित करा. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर काेल्हापुरात पाणी यायला किमान १८ तास लागतील, पण त्या अलीकडे असलेल्या भागाची काळजी घ्या. अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी कायम संपर्कात राहा.अलर्ट करायला आलो आहे..पालकमंत्री म्हणाले, कोल्हापुरात अजून पूरजन्य स्थिती नसली तरी मी तुम्हाला अलर्ट करायला आलो आहे. धरणातील विसर्ग सुरू झाल्यावर पाण्याची पातळी कोणत्यावेळी, किती वाढते, याची तुम्हाला माहिती आहे. विसर्ग सुरू झाला की किमान १० हजार क्युसेस पाणी नदीत वाढणार. रस्ते बंद होणार, पाणी वाढणार आणि लोक पुरात अडकून पडणार, जेवढा वेळ ते अडकून राहतील तेवढा यंत्रणेवरील ताण वाढेल.

पूर ओसरताच पंचनामे करा..पूर ओसरला की लगेच शेतीचे पंचनामे सुरू करा. विहिरींमध्ये गेलेल्या पुराच्या पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा तयार ठेवा. स्थलांतराच्या ठिकाणी डॉक्टर व औषधांचे साठा तयार ठेवा. नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची, जेवणाची सोय करा. जनावरांसाठी चारा तयार ठेवा. सर्व विभागांनी समन्वयाने काम करा, मी म्हणजे तुम्ही आहात असे समजून यंत्रणा राबवा असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरDipak Kesarkarदीपक केसरकर