शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
3
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
4
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
5
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
6
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
7
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
8
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
10
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
11
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
12
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
13
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
14
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
15
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
16
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
17
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
18
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
19
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
20
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:17 AM

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाहू छत्रपती टर्मिनन्स रेल्वे स्थानकातून कधीकाळी १७ एक्सप्रेस धावत होत्या. मात्र, कोरोना संसर्गाच्या लाटेनंतर यातील ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाहू छत्रपती टर्मिनन्स रेल्वे स्थानकातून कधीकाळी १७ एक्सप्रेस धावत होत्या. मात्र, कोरोना संसर्गाच्या लाटेनंतर यातील आठ एक्सप्रेसच धावत आहेत. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाटही ओसरू लागली आहे. तरीसुद्धा प्रवाशांच्या मागणीला रेल्वे प्रशासन वाटाण्याच्या अक्षता लावत आहे.

विशेष म्हणजे प्रवाशांची मागणी असलेल्या पॅसेंजर गाड्या अजूनही सुरु झालेल्या नाहीत. केवळ पॅसेंजर रेल्वेमधूनच कोरोनाचा संसर्ग होतो का? अन्य गर्दीच्या ठिकाणी होत नाही का? असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रवाशांकडून केवळ पॅसेंजर रेल्वेतून प्रवास केला तरच कोरोना होताे का? अन्य ठिकाणी गर्दी केल्यानंतर होत नाही का? असा प्रश्न प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला विचारला जात आहे.

कोरोना संसर्गाची पहिली लाट आल्यानंतर कोल्हापूर रेल्वे स्थानकातील सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या. काही दिवसानंतर परराज्यातील प्रवाशांना परतीचा प्रवास म्हणून श्रमिक एक्सप्रेस मागणीनुसार तीन वेळा सोडण्यात आली. पुन्हा काहीकाळ ही सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर सध्या आठ एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत तर कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-सातारा, कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-कुर्डुवाडी या चार पॅसेंजर अद्यापही बंद आहेत. सद्यस्थितीत महागाईमुळे लोकांकडे पैसे नाहीत. त्यात एक्सप्रेसने प्रवास करायचा म्हटले तर आरक्षण केल्याशिवाय प्रवास करणे शक्य नाही. थेट तिकीट खिडकीतून तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना अर्थिक फटका बसत आहे.

मग पॅसेंजर बंद का ?

एका बाजूने निर्बंध शिथील होत आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या एस. टी. महामंडळाच्या बसेसही पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. मात्र, प्रवाशांची अधिक पसंती व गरजेची असलेली पॅसेंजर रेल्वे सुरु करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. अनेकांना रोजचा प्रवास पॅसेंजरमुळे सुलभ होत आहे. खिशालाही ही पॅसेंजर सेवा परवडते. त्यामुळे कोरोना संसर्गाचे कारण देऊन बंद केलेल्या चारही पॅसेंजर सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सध्या सुरु असलेल्या एक्सप्रेस (स्पेशल ट्रेन)

कोल्हापूर - मुंबई (कोयना एक्सप्रेस),कोल्हापूर - अहमदाबाद, कोल्हापूर - दिल्ली (निजामुद्दीन), कोल्हापूर - तिरुपती (हरिप्रिया), कोल्हापूर - गोंदिया, कोल्हापूर - नागपूर, कोल्हापूर - मुंबई (महालक्ष्मी), कोल्हापूर - धनबाद यांचा समावेश आहे. याच एक्सप्रेसना स्पेशल ट्रेन म्हणून संबोधले जात आहे.

बंद असलेल्या उर्वरित एक्सप्रेस, पॅसेंजर अशा

राणी चन्नमा (मिरजेहून), कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - सातारा, कोल्हापूर - कुर्डुवाडी, कोल्हापूर - मिरज, कोल्हापूर - सांगली अशा पॅसेंजर, तर कोल्हापूर - मुंबई (सह्याद्री), कोल्हापूर - सोलापूर, कोल्हापूर - हैदराबाद या गाड्यांचा समावेश आहे.

चौकट

गेल्या महिनाभरापासून रेल्वे स्थानकप्रमुख रजेवर आहेत. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना काही विचारणा करायची असेल तर कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे.

प्रतिक्रिया

कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटेनंतर आता बंद झालेल्या एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या सुरु होणे गरजेचे आहे. अनेकांना पॅसेंजर रोजच्या प्रवासासाठी कमी खर्चात मोठा आधार आहेत. त्यामुळे सर्व बंद झालेल्या रेल्वे पुन्हा प्रशासनाने प्राधान्यक्रमाने सुरु कराव्यात.

- शिवनाथ बियाणी, सदस्य, मध्य रेल्वे प्रवासी सल्लागार समिती, पुणे