शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी नको-मंत्री दादाजी भुसे; कोल्हापुरातील 'या' संकल्पनेचे केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 11:38 AM

गरज भासल्यास बफर स्टॉकमधून खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील.

कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत असून, हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी केले. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, म्हणजे बियाणे वाया जाण्याचा धोका उद्भवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विभागाच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व मनोजकुमार वेताळ उपस्थित होते.

कृषी मंत्री भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये, यासाठी राज्यव्यापी नियोजन करण्यात आले असून, गरज भासल्यास बफर स्टॉकमधून खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील. याबाबतीत गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा, शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, जेणेकरून दुबार पेरणी करावी लागणार नाही. कोल्हापुरी गूळ, आजरा घनसाळ तांदूळ, सांगलीचे बेदाणे (मनुके) व हळद उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी, चंदगड भागातील काजूला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावपातळीवर शेतकऱ्यांशी संवाद, त्यांचे योग्य पद्धतीने पोषण व्हावे, यासाठी किट देण्यात येणार आहे, असे सांगून आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून किट घ्यावे व जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वितरित करावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी नावीन्यपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीRainपाऊस