शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

खोटा इतिहास सांगू नका; सुरत लुटलीच आहे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 5:43 PM

त्यांच्या दुतांनी छत्रपतींवरच हल्ला केला

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकदा नव्हे तर दोनवेळा सुरतेवर स्वारी करून ती लुटली आहे. त्यामुळे राजकारण्यांनी इतिहास वाचावा, तो खोटा सांगू नये, या शब्दांत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी सुरत लुटीवर भाष्य करणाऱ्यांना मंगळवारी सत्ताधाऱ्यांना चांगलेच खडसावले.कोल्हापुरातील सायबर कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. पवार म्हणाले, मोगलांमुळे आम्हाला पदरी फौजा बाळगाव्या लागतात. त्यामुळे या फौजेच्या देखभालीसाठी शिवाजी महाराज यांनी १६६४ व १६७० अशी दोनवेळा सुरतेवर स्वारी करून १०० कोटी हाेन आणले. त्याच पैशांतून त्यांनी सिंधुदुर्गसारखे किल्ले उभारले. छत्रपतींनी एकूण १११ किल्ले उभारले. सुरत लुटीतून आणलेल्या सर्व पैशांचा त्यांनी विनियोग केल्याकडे डॉ. पवार यांनी लक्ष वेधले. डॉ.पवार म्हणाले, सध्या राजकारण्यांकडून खोटा इतिहास सांगितला जात आहे. त्यांनी तो अभ्यासावा, मात्र, खोटे काही सांगू नये.

आधी सांगून पाहिलेमुळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटण्याआधी तेथील व्यापाऱ्यांना आमच्या फौजेचे खर्च देण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्या दुतांनी छत्रपतींवरच हल्ला केला. त्यानंतरच महाराज यांनी सुरत लुटली. ही लुटताना त्यांनी आपली नीतीमत्ता सोडली नाही. मोहनदास पारेख नावाच्या व्यापाऱ्याचे निधन झाल्याने त्याचा वाडा जाळायचा नाही, लुटायचा नाही, अशी सक्त ताकीद महाराजांनी मावळ्यांना दिली होती, अशी आठवणही डॉ.पवार यांनी सांगितली.

सूरत लुटली की..या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरत लुटली की नेमके काय झाले? असा सवाल आपल्या भाषणात उपस्थित केला होता. पाटील यांच्या याच भाषणाचा धागा पकडत डॉ. जयसिंगराव पवार यांनी दुसऱ्यांदा भाषणाला उभा राहत सुरत लुटीचा पटच सभागृहासमोर उलगडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSuratसूरतhistoryइतिहास