शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

खोटा इतिहास सांगू नका; सुरत लुटलीच आहे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:43 IST

त्यांच्या दुतांनी छत्रपतींवरच हल्ला केला

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकदा नव्हे तर दोनवेळा सुरतेवर स्वारी करून ती लुटली आहे. त्यामुळे राजकारण्यांनी इतिहास वाचावा, तो खोटा सांगू नये, या शब्दांत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी सुरत लुटीवर भाष्य करणाऱ्यांना मंगळवारी सत्ताधाऱ्यांना चांगलेच खडसावले.कोल्हापुरातील सायबर कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. पवार म्हणाले, मोगलांमुळे आम्हाला पदरी फौजा बाळगाव्या लागतात. त्यामुळे या फौजेच्या देखभालीसाठी शिवाजी महाराज यांनी १६६४ व १६७० अशी दोनवेळा सुरतेवर स्वारी करून १०० कोटी हाेन आणले. त्याच पैशांतून त्यांनी सिंधुदुर्गसारखे किल्ले उभारले. छत्रपतींनी एकूण १११ किल्ले उभारले. सुरत लुटीतून आणलेल्या सर्व पैशांचा त्यांनी विनियोग केल्याकडे डॉ. पवार यांनी लक्ष वेधले. डॉ.पवार म्हणाले, सध्या राजकारण्यांकडून खोटा इतिहास सांगितला जात आहे. त्यांनी तो अभ्यासावा, मात्र, खोटे काही सांगू नये.

आधी सांगून पाहिलेमुळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटण्याआधी तेथील व्यापाऱ्यांना आमच्या फौजेचे खर्च देण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्या दुतांनी छत्रपतींवरच हल्ला केला. त्यानंतरच महाराज यांनी सुरत लुटली. ही लुटताना त्यांनी आपली नीतीमत्ता सोडली नाही. मोहनदास पारेख नावाच्या व्यापाऱ्याचे निधन झाल्याने त्याचा वाडा जाळायचा नाही, लुटायचा नाही, अशी सक्त ताकीद महाराजांनी मावळ्यांना दिली होती, अशी आठवणही डॉ.पवार यांनी सांगितली.

सूरत लुटली की..या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरत लुटली की नेमके काय झाले? असा सवाल आपल्या भाषणात उपस्थित केला होता. पाटील यांच्या याच भाषणाचा धागा पकडत डॉ. जयसिंगराव पवार यांनी दुसऱ्यांदा भाषणाला उभा राहत सुरत लुटीचा पटच सभागृहासमोर उलगडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSuratसूरतhistoryइतिहास