शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

दूधगंगेचा एकही थेंब इचलकरंजीला देणार नाही, सुळकुड योजनेविरोधात कोल्हापुरात मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:32 AM

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगेचे पाणी सुळकूड योजनेंर्तगत नेण्यासाठीचा प्रकल्प शासनाने हाती घेतला असून, त्याला भागातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे.

कोल्हापूर : दूधगंगा नदी प्रकल्पासाठी आम्ही कष्टाने कमावलेली जमीन दिली आहे, हे पाणी भागातील गावकऱ्यांच्या-शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे, यातील एक थेंब पाणीहीइचलकरंजीला नेऊ देणार नाही, असा निर्धार करत भागातील शेतकऱ्यांनी सुळकूड पाणी योजनेविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. उशाला असलेल्या पंचगंगेचे पाणी स्वच्छ करा, कृष्णा नदी योजनेची गळती काढून हवे तेवढे पाणी इचलकरंजीला द्या, पण दूधगंगेचे पाणी नेण्याचा प्रयत्न झाला तर शासकीय अधिकाऱ्यांना कोंडून ठेवू, असा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना याबाबतचे निवेदन दिले.

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगेचे पाणी सुळकूड योजनेंर्तगत नेण्यासाठीचा प्रकल्प शासनाने हाती घेतला असून, त्याला भागातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. आपला हा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, सुळकूड पाणी योजना रद्द झालीच पाहिजे, देणार नाही देणार नाही, पाणी आम्ही देणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या.

विजय देवणे म्हणाले, सुळकूड योजना राबवण्यासाठी जे कोणी अधिकारी गावांमध्ये येतील त्यांना काम करू दिले जाणार नाही. त्यांना कोंडून पुढील टप्प्यात ज्या राजकारण्यांचा या योजनेला पाठिंबा आहे त्यांच्या घरावर मोर्चो काढू. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले, दूधगंगेतील एक थेंबही पाणी इचलकरंजीला देणार नाही. नदीतील ०.५ टीएमसी पाण्यावर भागणार नाही, पुढे जाऊन ही गरज वाढणार आहे. अंबरिष घाटगे म्हणाले, पुढच्या पिढीचा विचार करून शेतकरी यात सहभागी झाले आहेत. प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्यात.

भवानीसिंग घोरपडे म्हणाले, दूधगंगा प्रकल्पासाठी सगळ्यांनी आपली शेती दिली आहे. पंचगंगेचे पाणी इचलकरंजी येथील उद्योगांनीच दूषित कले आहे. ते स्वच्छ करा, कृष्णा योजनेची गळती काढा, इचलकरंजीचा पाणीप्रश्न मिटेल. प्रमोद पाटील, बाबासाहेब पाटील म्हणाले, दूधगंगा प्रकल्पासाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांचा या पाण्यावर हक्क आहे. कुणीही यावं आणि आमचं पाणी न्यावं असं होऊ देणार नाही. राजू पवार म्हणाले, सुळकूड योजनेसाठीचे १५६ कोटी रुपये पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी वापरावेत.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, स्थानिक नागरिकांची सिंचन, पिण्यासाठी, औद्योगिक व अन्य कारणांसाठीची गरज भागवून उरलेले पाणी देण्यात येईल. तुमच्या हक्काच्या पाण्याला कोणीही हात लावणार नाही, त्यामुळे घाबरू नका. तांत्रिक मान्यता घेताना प्रकल्पासाठी एमजेपीला पंचगंगेेऐवजी दूधगंगेचे पाणी का वापरणार याची कारणमीमांसा द्यावी लागते. ते कारण योग्य असेल तर प्रकल्पाचा विचार होईल. कागल, शिरोळ, सुळकूडसह पंचक्रोशीतील विविध गावांमधील हजारावर नागरिक, शेतकरी उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले होते.

अभियंता असाल प्रशासक नाही

जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे पाणी योजनेतील बाबी समजावून सांगत असताना मध्येच एकजण म्हणाला, हे काही आपण काही सांगू नका, मी सिव्हिल इंजिनिअर आहे. तुमच्यापेक्षा जास्त माहिती मला आहे. यातलं काही घडत नसतं. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही अभियंता असाल, पण प्रशासक नाही. प्रशासनाचे अधिकार तुम्हाला नाहीत, एवढेच असेल तर इरिगेशनमध्ये जाऊन नियमांची माहिती करून घ्या, असे सुनावले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीichalkaranji-acइचलकरंजी