शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

गावापेक्षा शहरात दरडोई दुप्पट पाणी नियोजनातील गोंधळामुळे टंचाई

By admin | Published: April 15, 2016 11:16 PM

टंचाई निवारण कृती आरखड्यातून स्पष्टनियंत्रण गरजेचे

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर -जिल्ह्यात सध्या ग्रामीणपेक्षा शहरातील नागरिकांना रोज दरडोई पाणी दुप्पट मिळत असल्याचे प्रशासनाने तयार केलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यातून स्पष्ट होते तरीही शहरातील काही भागात पाणी पुरेशा प्रमाणात येत नाही, कमी दाबाने येते अशी सार्वत्रिक तक्रार आहे. उपलब्ध पाण्यातून प्रशासनाने १५ जूनपर्यंत पिण्यासाठी पाणी देण्याचे नियोजन केले आहे; परंतु, अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर नियोजनशून्य कारभारामुळे पाणीटंचाईला सामारे जावे लागत आहे. बेसुमार नासाडी, वेळेत गळती काढणे यावर वचक नसल्याचेही समोर येते आहे.यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने अनेक विंधन विहिरी आटल्या. विहिरीतील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी व तलावावर उपसा बंदी करून उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव केले. नियोजनात कोल्हापूरसह सर्व नगरपालिका, नगरपरिषद हद्दीतील लोकांना कमीत कमी ५० ते अधिकाधिक १७० लिटर पाणी दरडोई मिळते. याउलट ग्रामीण भागातील लोकांना कमीत कमी २० आणि अधिकाधिक ७० लिटर पाणीपुरवठा दरडोई केला जात आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळचे तलाव, सार्वजनिक विहिरी, विंधन विहीर, नदी यांच्यातून पाणी पिण्यासाठी पुरवठा होतो. कोल्हापूर शहरात राधानगरी धरणातून पाणीपुरवठा होतो. टंचाईमुळे गेल्या दोन आठवड्यापासू एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दरडोई १३५ ऐवजी १७० लिटर पाणी दिले जात आहे. राधानगरी धरणात पिण्यासाठी ०.४३६ टीएमसी पाणीसाठा राखीव आहे. इचलकरंजी शहरासाठी कृष्णा नदीतून पाणीपुरवठा होतो. या नदीतील पिण्यासाठी २२ दशलक्ष घनमीटर पिण्यासाठी आरक्षित आहे. कृष्णेत पिण्यासाठी पाणी सोडण्यासाठी पंचगंगा नदीत ८.५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. जयसिंगपूर शहरवासीयांना पिण्यासाठी कृष्णा नदीत १.९९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. कागल शहरास दूधगंगा नदी, जयसिंगराव तलाव येथून पाणीपुरवठा होतो. मात्र, पुरेसा पाणीसाठा नसल्याने सध्या जयसिंगराव तलावातून उपसा बंद आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘दूधगंगा’वर जॅकवेलमध्ये वाढीव क्षमतेचा पंप बसविण्यात आला आहे. ‘दूधगंगा’त १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. गडहिंग्लज शहरास हिरण्यकेशी नदीतून पाणीपुरवठा होतो. पिण्यासाठी या नदीत २ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. आवश्यकतेनुसार ते चित्री धरणातून हिरण्यकेशीत पाणी सोडले जात आहे. रोजचे पाणी वितरणदरडोई रोज होणारा पाणीपुरवठा लिटरमध्ये असा : ग्रामीण जनता - २० ते ७०, कोल्हापूर शहर (एक दिवस आड) - १७०, इचलकरंजी -८०, जयसिंगपूर - ११०, कागल - ५०, गडहिंग्लज - १३५, मलकापूर - ७०, मुरगूड -१००, कुरुंदवाड - ९०, पन्हाळा - ७०.नगरपालिकांसाठी आरक्षित पाणीमलकापूर शहरातील पाणीपुरवठ्यासाठी कडवी नदीतील ०.३९५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. मुरगूड शहरास सर पिराजीराव तलावातून पाणीपुरवठा होतो. या तलावातील शेतीसाठी वापरणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणल्यास जुलैपर्यंत मुरगूडला पाणी मिळेल इतका पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. कुरुंदवाड शहरासाठी कृष्णा-पंचगंगा नदीमधील १.८४८१ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. पन्हाळावासीयांना पिण्यासाठी कासारी नदीतून ०.२७ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे.