शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मुद्रांक वाढल्याने कोल्हापूरकरांच्या खिशातून महिन्याला १६ लाखांवर अधिक पैसे जाणार, साठेखत करणाऱ्यांना भुर्दंड 

By भीमगोंड देसाई | Updated: March 12, 2025 15:49 IST

दस्त अभिनिर्णयासाठीच्या शुल्कात दहापट वाढ, ‘लाडक्या बहिणीसाठी’ इतरांच्या खिशात हात

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जमीन व घर घेताना केल्या जाणाऱ्या साठेखतासाठी आता शंभरऐवजी ५०० रुपयांचे मुद्रांक आणि दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी शंभरऐवजी दहापट म्हणजे एक हजार रुपये शुल्क मोजावे लागणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर केल्याने महिन्याला १६ लाखांवर अधिक पैसे कोल्हापूरकरांच्या खिशातून शासनाच्या तिजोरीत जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या ‘लाडकी बहीण’सारख्या लोकप्रिय योजना सुरू ठेवण्यासाठी शासन अशा प्रकारे दुसऱ्यांच्या खिशात हात घालत असल्याचे पुढे आले आहे.राज्य सरकारचा सोमवारी अर्थसंकल्प जाहीर झाला. त्यावेळी साठेखत, हिस्सारपत्र करण्यासाठीच्या मुद्रांकात ४०० रुपयांची वाढ केली आहे. शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पात घर बुकिंग केल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेसाठी साठेखत करावे लागते. यासाठी आता १०० रुपयांचे मुद्रांक चालत होते. मात्र नव्या आदेशानुसार ५०० रुपयांचे मुद्रांक जोडावे लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अशी साठेखते महिन्याला सरासरी चार ते साडेचार हजार होतात. वाढीव ४०० प्रमाणे महिन्याला यातून १६ लाख रुपये शासनाला जादा महसूल मिळणार आहे.

पाच गुंठ्यांपेक्षा अधिक भूखंडावर बांधकाम करण्यासाठी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडे दस्त अभिनिर्णय प्रकरणे दाखल करताना शंभरऐवजी एक हजार रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. एखाद्या मालमत्तेचा रेडीरेकनर निश्चित नसेल, राष्ट्रीय महामार्गावरील जमीन आणि ५०० चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम करण्यासाठी अशी प्रकरणे दाखल करावी लागतात. अशी जिल्ह्यातून दर महिन्याला १५ ते २० प्रकरणे दाखल होतात. वाढीव दरानुसार यातून शासनास दर महिन्याला १८ हजार रुपये अधिक मिळणार आहेत. अशा प्रकारे एका जिल्ह्यातून १६ लाख १८ हजार रुपये जादा जनतेच्या खिशातून शासनाकडे जाणार आहेत. संपूर्ण राज्यातून कोट्यवधी रुपयांचा जादाचा महसूल याद्वारे संकलित होणार आहे.बांधकाम प्रकल्प परिसरातून अधिकबांधकाम प्रकल्प सुरू असलेल्या परिसरात फ्लॅट बुकिंग करताना साठेखत बंधनकारक आहे. यासाठी पूर्वी शंभर रुपयांचे मुद्रांक भरावे लागत होते. फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना त्याचे काहीही वाटत नव्हते. पण आता जादा ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. बांधकाम प्रकल्प सुरू असणाऱ्या परिसरातून प्रत्येक साठेखतामागे चारशे रुपये वाढणार असल्याने शासनाच्या महसुलातही भर पडणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर