शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

..अन् रेल्वे समिती अध्यक्षांनी दिला राजीनामा, बैठकीवर बहिष्कार टाकून ३० खासदार पडले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 12:50 PM

उपस्थित सर्व खासदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अतुल आंबी

इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य विभागीय रेल्वे समितीतील खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नकारात्मक उत्तरे दिल्याने सोलापूर विभागीय रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राजीनामा दिला. त्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय तीस खासदारांनी बैठकीवर बहिष्कार टाकून वॉक आऊट केले. त्यामुळे राज्यातील रेल्वेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला.पुणे येथील रेल्वेच्या मुख्यालयात मंगळवारी पुणे आणि सोलापूर विभागीय समितीची बैठक होती. या बैठकीसाठी समितीचे अध्यक्ष तथा म्हाडाचे खासदार रणजितसिंह यांच्यासह तीस खासदार उपस्थित होते. बैठकीपूर्वी राज्यातील रेल्वेचे विविध प्रश्न सदस्य खासदारांनी समितीसमोर लेखी पाठवले होते. त्यावर कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाणार, याबाबत सकारात्मक उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित होते. परंतु सर्वांच्याच प्रश्नांना अधिकाऱ्यांनी नकारात्मक उत्तरे दिली.सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याऐवजी रेल्वेकडे उत्पादनाचा स्त्रोत म्हणून पाहून नकारात्मक उत्तरे आल्याने उपस्थित सर्व खासदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर महाराष्ट्र रेल्वेच्या अशा नकारात्मकतेमुळे अध्यक्ष रणजितसिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्याला समर्थन करत सर्वच खासदारांनी वॉक आऊट केले.बैठकीस खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीनिवास पाटील, ए.के. लाहोटी, राजेश अरोरा, मनजित सिंग, मुकुल जैन यांच्यासह पुणे विभागाचे रेणू शर्मा, ब्रिजेशकुमार सिंग, प्रकाश उपाध्याय,  सोलापूर विभागाचे निरजकुमार दोहारे, चंद्रा भूषण, प्रदीप हिरडे, आदी उपस्थित होते.

केंद्रीय बैठकीत होणार चर्चाकेंद्रीय रेल्वे समितीची गुरूवारी (दि.२०) दिल्लीत बैठक आहे. राज्यातील खासदार धैर्यशील माने आणि उदयनराजे हे त्या समितीचे सदस्य आहेत. राज्यातील या गलथान कारभाराची सर्व माहिती त्या बैठकीत देणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.

कोल्हापूरचे प्रश्नकोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वेबाबत खासदार माने यांनी लेखी प्रश्न दिले होते. त्यामध्ये, बंद केलेल्या चार गाड्या पुन्हा सुरू करणे, कराड-इचलकरंजी-बेळगाव मार्गाला मंजुरी देणे, डब्बल लाईन, बंद केलेले थांबे सुरू करणे, उड्डाण पुलाचे प्रश्न, निकृष्ट दर्जाचे काम, सर्व्हिस स्टाफ नाही, पॅसेंजर गाड्यांची संख्या कमी केली, आदी प्रश्नांचा समावेश होता.

खासदारांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न : लाहोटी

दरम्यान, रेल्वेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, विभागीय समितीच्या बैठकीत रेल्वेच्या योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. खासदारांच्या मार्गदर्शनानुसार रेल्वे प्रशासन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करेल तसेच खासदारांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी सांगितले.

रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात कोविडपूर्वी ज्या स्थानकावर रेल्वे थांबा होता असे सर्व पूर्ववत थांबे मिळावेत, लोकांची गैरसोय थांबावी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांचे रेल्वेसंबंधी प्रश्न सुटावेत, भुयारी मार्ग व दोन गावांना जोडणारे रस्ते सुरू करावेत. सर्व स्टेशनवर चांगल्या सुविधा व सुधारणा कराव्यात, किसान रेल चालू ठेवावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यासाठी वारंवार रेल्वे अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा हे प्रश्न सुटत नाहीत. लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाहीत. थातूरमातूर उत्तरे देतात. रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सुटत नसल्याने सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देत आहे. - रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार, माढा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे