शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

महापुराच्या काळात सामाजिक संस्थांनी लढवली खिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:25 AM

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेने महापुराच्या नियोजनासाठी पावसाळ्यापूर्वी बैठका घेतल्या. पूर परिस्थितीचे नियोजन केले परंतु ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील नगरपालिकेने महापुराच्या नियोजनासाठी पावसाळ्यापूर्वी बैठका घेतल्या. पूर परिस्थितीचे नियोजन केले परंतु प्रत्यक्षात महापूर आल्यानंतर चहा-नाष्ट्यापासून ते दोनवेळचे जेवण, आरोग्यसेवा, जनावरांना चारा, पूर ओसरल्यानंतर जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप हा संपूर्ण भार विविध दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनीच पेलला. नगरपालिकेने आपत्तीत काहीच खर्च केला नाही. त्यामुळे श्रीमंत असलेल्या नगरपालिकेचा कारभार निवांतच राहिला.

दोन वर्षांत दोनवेळा इचलकरंजी शहराला महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. २०१९ साली नगरपालिकेने सेंट्रल किचन सुरू केले. विविध सामाजिक संस्था व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. यंदा मात्र महापुराच्या आपत्तीत पालिका नामानिराळीच राहिली. नगरपालिकेच्या शाळा मोकळ्या करून त्या ठिकाणी पूरग्रस्त छावण्या निर्माण करून देण्यापलीकडे पालिकेने काहीच केले नाही. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध व्यक्ती व सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. २०१९ पासून महापूर त्यानंतर २ वर्षे कोरोना या सर्व आपत्कालीन परिस्थितीत यथाशक्ती मदत करणाऱ्या संस्थांनीच या महापुराचा भार सोसला.

शहरातील विविध भागात पाणी शिरल्याने त्या परिसरातील ४ हजार ५२३ कुटुंबातील सुमारे २५ हजार नागरिक स्थलांतरित झाले होते. त्यातील नगरपालिकेच्या १८ छावण्यांमध्ये १७ हजार नागरिक आसरा घेत होते. या सर्वांचा चहा-नाष्टा, जेवणाची सोय विविध सामाजिक संस्था, व्यक्तींनी केली. त्यामध्ये राहुल खंजिरे (१२00), तेलनाडे फौंडेशन (३५00), आमदार प्रकाश आवाडे (२५00), सागर चाकळे (१२00), मनोज साळुंखे (५00), नागेश शेजाळे (लहान मुलांसाठी दूध, नाष्टा), मारवाडी समाज (३00) आणि वैद्यकीय मदत डॉ. कोरे व तेेलनाडे फौंडेशन याशिवाय आवश्यकतेनुसार आवाडे समर्थ ग्रुप व माणुसकी फौंडेशन यांच्या वतीने जेवण पोहोच केले जात होते. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था व कार्यकर्ते इतर मदतीसाठी तत्पर होते. पूर ओसरल्यानंतर घरी परतणाऱ्या कुटुंबांना गहू, तांदूळ व जीवनावश्यक वस्तूचे किट वाटपही शहरासह बाहेरून विविध संस्थांनी मदत केली. त्याचबरोबर पूरग्रस्त परिसरातील स्वच्छता मोहिमेतही सहभाग घेतला.

चौकट - कोरोना आपत्तीतही पालिकेची भूमिका जेमतेम

नगरपालिकेने दोन ठिकाणी कोविड केंद्र सुरू केले. अनेकवेळा या केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला. नाष्टा व जेवण याच्या दर्जाकडेही दुर्लक्ष झालेे. आरोग्य सभापतींनाच अनेकवेळा पालिकेच्या पदाधिकाऱ्याबरोबर हुज्जत घालावी लागली. त्यामुळे श्रीमंत नगरपालिकेच्या आशा लक्षणाला काय म्हणावे ? असा सवाल उपस्थित होत आहे.