शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

महाराष्ट्रात १५ नोव्हेंबरपर्यंत भूकंप, हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:26 PM

संशोधनातून निष्कर्ष

सतीश पाटीलकोल्हापूर : भूगर्भातील टॅक्टॉनिक प्लेट्सच्या गतिशीलतेने हवामानात बदल होत असून १५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रासह भारतातील विविध भागांत भूकंपाचे धक्के बसण्याची दाट शक्यता आहे, असे प्राथमिक संशोधन निष्कर्षातून ‘सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणे’ दाखवीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केला आहे.महाराष्ट्रासह उत्तर भारतात ‘ईक्यू क्लाउड' (भूकंप ढग) व धुक्याची निर्मिती होत असून, येत्या काळात महाराष्ट्रात मुंबई, कोकण किनारपट्टी, कोयना धरणक्षेत्रासह गुजरात सीमेवर, कच्छ भागात, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या पट्ट्यात दिल्ली, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह-लडाख, ईशान्य भारतातील सात राज्ये, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ तसेच उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात मात्र हा धोका जवळपास अत्यंत कमी किंवा नाही, असे निष्कर्षदेखील प्रा़ किरणकुमार जोहरे यांनी बनविलेल्या ‘सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणां’वर मिळाले आहेत.तापमान चढउतार आणि जमिनीखाली टॅक्टॉनिक प्लेट्सच्या गतिशीलतेने बाष्प बदल व बदल परिणामी भूकंप ढगांची व धुक्याची निर्मिती होत आहे. प्रा़ किरणकुमार जोहरे यांनी किमान चार प्रकारच्या भूकंप ढगांचा शोध लावला असून सध्या महाराष्ट्रात तसेच उत्तर भारतातही भूकंप ढगांची आणि धुक्याची निर्मिती होत आहे. येत्या काळात ४ ते ८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनासह समन्वयाने एकजुटीने ‘टीमवर्क’साठी आपत्कालीन व्यवस्था, नागरी संरक्षण दल, एनएसएस, एनसीसी पथकं आदींनीदेखील तयार राहण्याची अपरिहार्य व गंभीर आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEarthquakeभूकंपMaharashtraमहाराष्ट्र