शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

ED Raid: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सीईओं’सह पाच अधिकाऱ्यांची तब्बल ७० तासांनंतर सुटका, ‘गोल्ड’ लोनचीही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 4:11 PM

कारभाराची दोन दिवस ‘ईडी’ने चौकशी करूनही बँकेच्या ठेवीत तब्बल २०० कोटींनी वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह पाच अधिकाऱ्यांची काल, शुक्रवारी रात्री दहा वाजता मुंबईतील ईडी कार्यालयातून ७० तासांच्या चौकशीनंतर सुटका करण्यात आली.ईडीच्या पथकाने बुधवार व गुरुवारी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह दोन शाखा व संताजी घोरपडे साखर कारखान्याची चौकशी केली. या कालावधीत बँकेचे कामकाज काहीसे विस्कळीत झाले होते. कारभाराची दोन दिवस ‘ईडी’ने चौकशी करूनही बँकेच्या ठेवीत तब्बल २०० कोटींनी वाढ झाली. चौकशी सुरू असतानाही कर्मचाऱ्यांनी बँकेचे कामकाज सुरळीत ठेवले, त्याचबरोबर ठेवीदारांनीही बँकेवरील विश्वास कायम ठेवला. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर व राजू खाडे यांना गुरुवारी सायंकाळी पुढील चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांना घेऊन पथक गुरुवारी रात्री दीड वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात पोहोचले. त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शुक्रवारी दिवसभरही त्यांच्याकडून जबाब नोंदवण्यात आला.सायंकाळी पाचपर्यंत सोडतील, असे बँक वर्तुळात चर्चा होती. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्यांना सोडण्यात आले नव्हते. गुरुवारी रात्रीच बँकेच्या अधिकाऱ्यांपाठोपाठ कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी दिलीप लोखंडे, इंद्रजित घाटगे, अजित पाटील, संजय साबळे हे मुंबईला रवाना झाले. ते शुक्रवारी दिवसभर ईडी कार्यालयाच्या बाहेर थांबून होते.

‘गोल्ड’ लोनचीही केली चौकशीजिल्हा बँकेकडे गोल्ड लोन किती आहे, त्यामध्ये अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचे किती आहे? याची चौकशीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे समजते.

‘ईडी’चे अधिकारी फेराखाली झोपायचे, मात्र...बुधवारी रात्रभर चौकशी सुरू असताना ‘ईडी’चे अधिकारी दोघे-दोघे जाऊन झोपायचे व पुन्हा तपासणीसाठी यायचे. मात्र, बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांना हलू दिले नसल्याचे सांगण्यात आले.

पोलिस बंदोबस्तात जेवणमुंबईला नेलेल्या पाच अधिकाऱ्यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयातून दोघादोघांना पोलिस बंदोबस्तात जेवणासाठी बाहेर आणले होते.

बँकेच्या अधिकाऱ्यांचे फोन बंदचौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांचे फोन गुरुवारपासून बंद करण्यात आले आहेत. त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ देत नसल्याने त्यांच्या कुटुंबांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय