शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Eknath Shinde: २५ लाख हेक्टर शेती सेंद्रिय पद्धतीने, एकनाथ शिंदे यांची घोषणा

By समीर देशपांडे | Published: February 20, 2023 4:29 PM

Eknath Shinde: महाराष्ट्रामध्ये २५ लाख हेक्‍टरवर सेंद्रिय शेती करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

- समीर देशपांडे कोल्हापूर  : एकीकडे विकासाची प्रक्रिया गतीने सुरू असताना दुसरीकडे जमिनीसह पंचमहाभूतांची अतोनात हानी होत आहे. म्हणूनच यातून सावरण्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये २५ लाख हेक्‍टरवर सेंद्रिय शेती करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.   कोल्हापूर पासून जवळच असलेल्या कनेरी मठावर आयोजित सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारला जात आहे. जे काम शासनाच्या पातळीवर करण्याची गरज आहे तेच काम आज कणेरी मठाच्या माध्यमातून होत असून त्याला पाठबळ देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. या पुढच्या काळात देखील अशा पद्धतीचे लोकोत्सव महाराष्ट्रभर व्हावेत यासाठी शासन प्रयत्न करेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले संपूर्ण मानव जातीला अनेक प्रश्नांनी ग्रासले आहे. विविध प्रकारची प्रदूषणे ही रोगराईला आमंत्रण देत आहेत या पार्श्वभूमीवर सिद्धगिरी मठावर आयोजित या पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून जागरण होईल असा विश्वास आहे. स्वामींवरील विश्वासामुळेच याचा संदेश सर्व जनतेपर्यंत जाईल. महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेतीला पाठबळ देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्माण करण्याचे ही ठरवले आहे. यावेळी खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे प्रकाश अबिटकर यांच्यासह वेगवेगळ्या राज्यातून आलेले मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे