शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Kolhapur: शेतीला दिवसा वीज, बिलाची माफी ५ वर्षे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 1:38 PM

नेसरी येथे जनसन्मान यात्रेत घोषणा

गडहिंग्लज : राज्यातील ३ ते ७ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल यापुढे शेतकऱ्यांनी भरायचे नाही, मागील बिलही द्यायचे नाही. ४४ हजार शेतकऱ्याच्या वीजबिल माफीचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय औटघटकेचा नाही. आता शेतीसाठी दिवसा वीज देणार असून वीजबिलाची माफी यापुढे ५ वर्षे कायम राहिल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.नेसरी येथे जनसन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, ‘गोकुळ’चे संचालक नवीद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठीच कांदा व बासुमतीवरील निर्यातबंदी हटविण्याबरोबरच निर्यात मूल्यदेखील हटविले आहे. कापूस व सोयाबीनला अधिक भाव मिळण्यासाठी खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवले आहे. हत्ती, बिबटे, गवे, रानडुकरे आदींपासून होणारी नुकसान भरपाईदेखील वाढविणार आहोत.

आमदार राजेश पाटील म्हणाले, अजित पवार, मुश्रीफ यांच्यामुळेच ‘चंदगड’ला १६०० कोटीचा निधी मिळाला. बाबासाहेब कुपेकर, नरसिंगराव पाटील यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तरीदेखील काही लोकांना आगडोंब होत आहे, जनताच त्यांना उत्तर देईल.खासदार तटकरे, शीतल फराकटे यांचीही भाषणे झाली. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. जानबा चौगुले यांनी स्वागत केले.

मुश्रीफांची अनुपस्थिती..अजितदादांचा खुलासा !पालकमंत्री मुश्रीफ या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. त्याबाबत खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला. इचलकरंजी येथील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळेच ते नेसरीला येऊ शकलेले नाहीत. माझ्या परवानगीनेच ते इचलकरंजीला गेले आहेत. त्याबाबत कोणताही गैरसमज नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुश्रीफांविषयी त्यांना एवढा पोटशूळ का ?हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. जिल्ह्याचा विकास आणि बहुजनांच्या हितासाठीच त्यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, केवळ व्यक्तीद्वेषातूनच ‘संसदरत्न’ (सुप्रियाताई सुळे) त्यांच्यावर टीका करीत आहेत. मुश्रीफांविषयी त्यांना एवढा पोटशूळ का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीelectricityवीज