शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

साळशी गाव पाण्यासह विजेने स्वयंपूर्ण होणार

By admin | Published: March 04, 2016 12:46 AM

विद्यार्थ्यांचा प्रकल्प : ‘मेक इन इंडिया’तून नियोजन

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील साळशी गाव वीज, पाणी याबाबत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाची निवड ‘मेक इन इंडिया’मध्ये झाली आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर या गावात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. प्रकल्पातील कामे पूर्ण झाल्यानंतर गाव स्वयंपूर्ण होईल, असा दावा पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.शिक्षण घेतलेले तरुण नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसाय करावा, यासाठी ‘मेक इन इंडिया’ उपक्रम केंद्र सरकारने घेतला. या उपक्रमांतर्गत मुंबईत आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा झाली. स्पर्धेत देश-विदेशांतील अनेक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण झाले. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये सिव्हील व मेकॅनिकल अभ्यासक्रम शिकणारे प्रवीण मेंगाणे, प्रतीश वाले, प्रणव भटाले, रविराज पाटील यांनी ‘पाणी’ हा विषय घेऊन तयार केलेला ‘स्वयंपूर्ण खेडे’ हा प्रकल्प सादर केला.प्रकल्पासाठी जानेवारी महिन्यात हे चार विद्यार्थी अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात जाऊन सर्व्हे केला. त्यावेळी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे निदर्शनास आले. सन १९७२ मध्ये बांधलेल्या तलावातही पाणी साठून राहत नाही. अन्य दोन लहान तलावही जानेवारी महिन्यातच कोरडे पडतात, असे समोर आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काय उपाययोजना करायला हव्यात, या अंगाने अभ्यास केला. गावाजवळ डोंगर आहे. पाणी अडविण्यासाठी छोट्या चरींची खुदाई करणे, गाळ थांबू नये, केवळ पाणीच थांबावे, असे बंधारे बांधणे, तीव्र उतार असलेल्या ठिकाणी पाण्यापासून विजेच्या निर्मितीचा प्रकल्प उभारणे, नैसर्गिक पाण्याचे स्रोत बळकट करणे, तलावातील गाळ काढणे अशा कामांचा दीड कोटींचा आराखडा केला आहे. ‘मेक इन इंडिया’त निवड झाल्यामुळे हा प्रकल्प केंद्र शासन वेबसाईटला प्रसिद्ध करून विकासासाठी कंपन्या, उद्योजकांना आवाहन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)आमच्या कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांनी साळशी गावावर तयार केलेला स्वयंपूर्ण खेडे प्रकल्प ‘मेक इन इंडिया’त सादर केला. त्याची निवड ‘मेक इन इंडिया’त झाली आहे. प्रकल्पातील कामे झाल्यानंतर गाव वीज, पाणी याबाबत स्वयंपूर्ण बनेल.डॉ. टी. बी. मोहिते-पाटील, प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज