शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:23 AM

कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या ...

कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या संरक्षक भिंती गायब होत आहेत. यामुळे चारही बाजूने जलशुद्धीकरण केंद्राच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.

भोगावती नदीवर ७० वर्षांपूर्वी पंपहाऊस उभारण्यात आले.यासाठी बालिंगा येथे नागदेववाडी येथील

शेतकऱ्यांची २३ एकर जमीन घेऊन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रासाठी विविध उपकरणे बसवण्यात आली. यातून जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी चंबूखडी येथील पाण्याच्या टाकीत टाकून जवळपास अर्धे शहर, चार-पाच उपनगरे याचबरोबर शेजारी असणाऱ्या शेकडो कॉलनींची तहान भागवत आहे.

पण या जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. या जलशुद्धीकरण केंद्राला ७० वर्षांपूर्वी बांधलेली दगडी सुरक्षा भिंत होती. पण सध्या ती चारही बाजूने जमीनदोस्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवती अतिक्रमणाचा विळखा पडू लागला आहे. या शिवाय या संपूूर्ण परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने पाण्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौकट : सुरक्षा चौकीभाेवती कचऱ्याचे ढीग

कोल्हापूर: गगनबावडा मार्गाकडे पूर्वेला सुरक्षा चौकी आहे. पण तिथे सुरक्षारक्षक नाही. या चौकीभोवती कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या केंद्राजवळ तळीरामांनी आपला अड्डा बनवला आहे. त्यामुळे येथे दिवसाही त्यांचा धिंगाणा सुरु असतो. त्यामुळे कचऱ्याबरोबरच बाटल्यांचा खचही नेहमी पडलेला दिसतो.

फोटो: २३ बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा भिंत गायब झाली असून काही ठिकाणी अतिक्रमण सुरू झाले आहे.