शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आता संध्याकाळपर्यंत कधीही होणार शालेय पोषण आहाराची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 20:31 IST

तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवीण यादव यांचा निर्णय

कोल्हापूर : जिल्'ातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शालेय पोषण आहाराच्या दर्जाची आता कधीही तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहाराचा नमुना शिल्लक ठेवण्याचे आदेश सर्व शाळांना देण्यात आले आहेत.

शाळांमध्ये दिल्या जात असलेल्या पोषण आहाराचा दर्जा चांगला नसल्याची बाब यादव यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याशी चर्चा करून याबाबत दोघांच्या सहीने परिपत्रक काढले आहे.जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, शिक्षण सभापती व समिती सदस्य यांच्याकडून या पोषण आहाराची कधीही तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आहाराचा नमुना सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेतच ठेवणे बंधनकारक राहणार आहे. आहाराचा दर्जा चांगला नसेल तर संबंधित ठेका रद्द करण्यात येणार आहे. आहारामध्ये वापरण्यात येणारा भाजीपाला, फळे, तांदूळ, कडधान्ये, तेल, पीठ या साहित्याचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे.

स्वयंपाकासाठीची भांडी स्वच्छ असावीत. परिसरामध्येही स्वच्छता असावी. पिण्यासाठीचे पाणी स्वच्छ व निर्जंतुक असावे. स्थानिक शिक्षण समिती सदस्यांनीही आहार संध्याकाळपर्यंत ठेवला आहे किंवा नाही याची खात्री करावी. तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. 

 

शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा, तेथे स्वच्छता असावी, यासाठी कधीही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शालेय पोषण आहाराचा दर्जा चांगला राहण्यासाठी मदत होईल.- प्रवीण यादवसभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoshan Parikramaपोषण परिक्रमाkolhapurकोल्हापूर