शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

नव्या हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:13 AM

उसाला प्रतिटन १४० रुपये अनुदानाचा प्रस्ताव

-चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : एक आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामात ५० लाख टन साखर निर्यात करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अन्न मंत्रालयाने तयार केला आहे. यासाठी कारखान्यांना गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन १४० रुपये अनुदान तसेच निर्यात केल्या जाणाºया साखरेला प्रतिटन अडीच ते तीन हजार रुपये वाहतूक अनुदान देण्याचा प्रस्तावही तयार केला आहे. हे दोन्ही प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येण्याची शक्यता आहे.अतिरिक्त साखर उत्पादनामुळे देशातील घसरलेले साखरेचे दर वधारावेत व अडचणीतील साखर उद्योगाला मदत व्हावी या उद्देशाने हे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. किनारपट्टी जवळ असलेल्या भागात अडीच हजार रुपये, तर अन्यत्र तीन हजार रुपये प्रतिटन वाहतूक अनुदान दिले जाण्याची शक्यता आहे. मंत्रालयाने या संदर्भातील प्रस्तावाच्या मसुद्यावर अन्य मंत्रालयांचे मत मागविले आहे. पुढील आठवड्यापर्यंत ते मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल, असेही या सूत्रांनी सांगितले.निर्यातीशिवाय पर्याय नाहीसाखरेच्या निर्यातीवर अनुदान देण्याच्या भारताच्या निर्णयाविरुद्ध ब्राझील आणि आस्ट्रेलिया या दोन देशांनी जागतिक व्यापार संघटनेकडे अधिकृतपणे तक्रार दाखल केली असली, तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कारण देशात गरजेपेक्षा जादा साखरेचे उत्पादन यंदा झाले आहे. नव्या हंगामातही साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याने अनुदान देऊन साखर निर्यात करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगण्यात येते....म्हणून अनुदानात वाढ२०१७-१८ च्या साखर हंगामात केंद्र सरकारने २० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले होते. यासाठी देशातील ५२८ साखर कारखान्यांना निर्यात कोटा ठरवून दिला होता. हा कोटा पूर्ण करणाऱ्या कारखान्यांच्या ऊस उत्पादकांना प्रतिटन ५५ रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही दर घसरलेले असल्याने आतापर्यंत केवळ पाच लाख टन साखरेचीच निर्यात होऊ शकली आहे. यामुळेच नव्या हंगामात अनुदानात भरीव वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे समजते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने