शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

आर्थिक अरिष्टातील साखर उद्योगाला इथेनॉलचा ‘बूस्टर’

By राजाराम लोंढे | Published: July 25, 2022 2:25 PM

बाजारपेठेची भूक ओळखून तेवढ्याच साखरेचे उत्पादन करुन उर्वरित इथेनॉलची निर्मिती करण्यास कारखान्यांनी सुरुवात केल्याने हा उद्योग सावरण्यास मदत होत आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : उसाचे वाढलेले क्षेत्र, त्यातून साखरेच्या उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे साखरेचे दर अस्थिर झाले होते. परिणामी सगळा साखर उद्योगच आर्थिक अरिष्टात सापडला होता. मात्र बाजारपेठेची भूक ओळखून तेवढ्याच साखरेचे उत्पादन करुन उर्वरित इथेनॉलची निर्मिती करण्यास कारखान्यांनी सुरुवात केल्याने हा उद्योग सावरण्यास मदत होत आहे.आगामी साखर हंगामात जिल्ह्यात २५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार आहे. स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेच्या दरातील अस्थिरतेमुळे साखर उद्योग अडचणीत आला. अडचणीत येण्यात हे जरी कारण असले तरी काही कारखान्यांमधील गैर व्यवस्थापन ही तितकेच कारणीभूत ठरले. हंगाम २०१५ पासून कारखाने अधिक अरिष्टात सापडत गेले.उसाची एफआरपी देण्यासाठी या कालावधीत तीन ते चार वेळा कारखान्यांना कर्जे घ्यावी लागली. साखरेचे आयात, निर्यात धोरणाचा फटका बसल्याने साखरेचे दर घसरत गेले. केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव निश्चित केला, मात्र एकीकडे एफआरपी वाढत असताना दुसऱ्या बाजूला त्या पटीत साखरेचे दर वाढले नाहीत, हेही वस्तुस्थिती आहे.

इथेनॉल, निर्यात धोरणामुळे साखर स्थिर

इथेनॉल निर्मिती केल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले, त्यात निर्यात धोरणामुळे गेल्या वर्षभर साखरेचे दर स्थिर राहिले आहेत. घाऊक बाजारात प्रति क्विंटल ३१०० ते ३२५० रुपयांपर्यंत साखर राहिली असली तरी किरकोळ बाजारात ३८०० पर्यंत आहे.

हे कारखाने करतात इथेनॉल निर्मिती दत्त-शिरोळ, गुरुदत्त-टाकळीवाडी, वारणा, दालमिया, शाहू, सदाशिवराव मंडलीक, संताजी घोरपडे, पंचगंगा, उदयसिंगराव गायकवाड.

‘कुंभी’, ’बिद्री’चा प्रकल्प प्रस्तावित

बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा वेदगंगा व कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्प प्रस्तावित आहेत. येत्या वर्षभरात ते चालू होणार असल्याने जिल्ह्यात इथेनॉलचे उत्पादन वाढणार आहे.

गेल्या पाच-सहा वर्षात साखर उद्याेग कधी नव्हे इतका अडचणीत आला. आता बाजारपेठेच्या गरजेनुसार साखर उत्पादन, इथेनॉल निर्मिती व निर्यात या त्रिसुत्रीमुळे साखर उद्योग हळूहळू बाहेर पडण्यास मदत होईल. - विजय औताडे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने