शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

शेतकरी 'ठिबक सिंचन'च्या अनुदानापासून कोरडे, 'ही' अट ठरतंय मारक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 1:53 PM

तब्बल चार लाखांवर शेतकरी योजनेपासून कोरडे

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून तुषार आणि ठिबक सिंचनसाठी अनुदान मिळण्यासाठी कमीत कमी २० गुंठे शेतीची अट असल्याने जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना पाटानेच पाणी द्यावे लागत आहे. या अटीमुळे तब्बल चार लाखांवर शेतकरी योजनेपासून कोरडे राहिले आहेत. परिणामी या अत्यल्प भू-धारकांसाठी सामूहिक शेती उपसा सिंचन योजनेद्वारे अनुदानाचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.शासनाच्या कृषी विभागाकडील योजनेतून सध्या ठिबक, तुषार सिंचनसाठी ७० टक्क्यांपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त एकरी २५ ते ३० हजारांपर्यंत अनुदान मिळते. यासाठी २० गुंठ्यांपेक्षा अधिक जमीन असणे बंधनकारक आहे. यातून प्रत्येक वर्षी एक हजार ते १५०० शेतकरी अनुदानाचा लाभ मिळवतात. पण दिवसेंदिवस जमिनीचे तुकडे जास्त पडत असल्याने अत्यल्प भू-धारकांची संख्या वाढते आहे. यामुळे २० गुंठ्याच्या आतील शेतकरी ठिबक, तुषार सिंचनसाठीच्या अनुदानापासून दूर राहत आहेत. परिणामी याचा आर्थिक फटका गरीब, सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्ह्यातील सरासरी जमीनधारणा मुळातच कमी आहे. त्यातही भाऊहिस्से झाल्याने प्रत्येकाच्या वाट्याला कमी जमीन येत आहे. जमीन कमी म्हणून लाभ नाही असा अनुभव त्याला येत आहे.७० टक्के शेतकरी अपात्रजिल्ह्यात एकूण ६ लाख ६० हजार ६७६ शेतकरी आहेत. यापैकी ७० टक्के शेतकरी २० गुंठ्यांपेक्षा कमी जमीन असलेले आहेत. हे सर्व शेतकरी ठिबक, तुषार सिंचनसाठीच्या अनुदान योजनेत अपात्र आहेत. ही संख्या मोठी आहे. म्हणून सामूहिक उपसा सिंचन योजना राबवावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

आकडे बोलतात

  • २० गुंठ्याच्या आतील शेतकरी : ४ लाख
  • शून्य ते एक हेक्टरपर्यंत जमीन असणारे शेतकरी : ५ लाख ४ हजार ११७
  • एक ते दोन हेक्टरपर्यंत जमीन असणारे शेतकरी : १ लाख ५ हजार ४९२
  • दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असणारे शेतकरी : ५१ हजार ६७

कृषी विभागाकडील योजनेतून तुषार, ठिबक सिंचनसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी २० गुंठे जमीन असावी, अशी अट आहे. पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळतो. - जालंदर पांगरे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी