शहरं
Join us  
Trending Stories
1
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
2
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाला मविआला इशारा 
3
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
4
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
5
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
6
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
7
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
9
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
10
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
11
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
12
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
13
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
14
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
15
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
16
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
17
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
18
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
19
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
20
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!

सात वर्षे ५९ कोटी एफआरपीच्या प्रतीक्षेत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:14 AM

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकऱ्यांना चौदा दिवसांत उसाची एफआरपी देणे बंधनकारक असले तरी कोल्हापूर विभागातील हजारो ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेतकऱ्यांना चौदा दिवसांत उसाची एफआरपी देणे बंधनकारक असले तरी कोल्हापूर विभागातील हजारो शेतकऱ्यांचे गेली सात वर्षे ५९ कोटी ७ लाख एफआरपीचे पैसे अडकले आहेत. सहा कारखान्यांपैकी काही बंद असले तरी त्यांच्यावर आरआरसीची कारवाई झाली खरी; मात्र शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. मुळात ही कारवाईच कुचकामी असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उसाच्या निश्चित केलेल्या दरानुसार पैसे चौदा दिवसांत देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी संघटनांकडून सातत्याने रेटा लावलेला असतो. मात्र, कोल्हापूर विभागातील सहा कारखान्यांकडे सात वर्षांपासून एफआरपीचे पैसे मिळालेले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दौलत’, ‘आजरा’ तर सांगली जिल्ह्यातील वसंतदादा’, ‘महाकाली’, ‘माणगंगा’, केन ॲग्रो (डोंगराई) या कारखान्यांचा समावेश आहे. ‘दौलत’च्या शेतकऱ्यांचे २०११-१२ हंगामापासून १८ कोटी ११ लाख रुपये अडकले आहेत. आजरा कारखान्याची २०१८-१९ पासून १५ कोटी ४६ लाख रुपये देय एफआरपी आहे. उर्वरित चार कारखान्यांकडे २५ कोटी ४९ लाख रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत.

या प्रत्येक कारखान्यावर ‘आरआरसी’ची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे. वास्तविक त्या हंगामातील साखर जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे भागवणे अपेक्षित असते. साखर विक्रीतूनही शेतकऱ्यांची देणी पूर्ण झाली नाही, तर कारखान्याची स्थावर मालमत्ता विक्री करून पैसे द्यावेत, अशी ‘आरआरसी’ची कारवाई अपेक्षित आहे. मात्र, सात वर्षांपासून शेतकऱ्यांची प्रलंबित असणारी एफआरपीची रक्कम पाहता, ही कारवाईही कुचकामी ठरल्याचे स्पष्ट होते. केवळ कागदी घोडे नाचवायचे आणि वेळ मारून नेण्याचा प्रकारच येथे घडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

कारखानानिहाय थकीत एफआरपी-

कारखाना हंगाम थकीत

दौलत २०११-१२ १८.११ कोटी

आजरा २०१८-१९ १५.४६ कोटी

वसंतदादा २०१३-१४ ५.५४ कोटी

महाकाली २०१८-१९ ७.९७ कोटी

माणगंगा २०१८-१९ ३.३२ कोटी

केन ॲग्रो २०१८-१९ ८.६५ कोटी

कोट-

संघटनांनी आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी कारवाई करायची आणि ती कारवाई कागदावर राहणार असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे? जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की नाही? थकीत एफआरपीबाबत पुन्हा आंदोलन हातात घ्यावे लागेल.

- प्रा. जालंदर पाटील (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)