शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ दोन तुकड्यातच देणार; राजू शेट्टींनी सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 11:50 AM

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दोन टप्प्यात एफआरपी देणार असल्याचे पत्र सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठविले आहे

कोल्हापूर : उसाची एफआरपी एकरकमी देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दोन टप्प्यात एफआरपी देणार असल्याचे पत्र सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, शेतकऱ्यांच्या अन्नात कोणी माती कालवणार असेल तर त्याला धडा शिकवला जाईल, रस्त्यावरील लढाईसाठी राज्य सरकारने सज्ज रहावे, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.केंद्र सरकारच्या ‘शुगर केन कंट्रोल ॲक्ट १९६६ अ’ नुसार शेतकऱ्यांना उसाची एफआरपी १४ दिवसाच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, हा कायदा साखर कारखानदारांना अडचणीचा ठरत असल्याने त्यांनी केंद्र सरकारकडे एफआरपी दोन तुकड्यात देण्याची मुभा मागितली होती. केंद्र सरकारने हा निर्णय संबंधित राज्यांना घेण्यास सांगितले.राज्य सरकारने दोन टप्प्यात एफआरपी देण्याचे फर्मान काढले. त्याला सर्वच शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी २२ फेब्रुवारीला राज्य सरकारकडे केली होती. ती फेटाळून लावली असून तसे पत्र सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी शेट्टी यांना पाठविले आहे.

स्वाभिमानी’कडून न्यायालयात आव्हानसाखर कारखानदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकारने केले आहे. केंद्र सरकारचा कायदा मोडण्याचा राज्यांना कोणी अधिकार दिला? याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून रस्त्यावरील संघर्ष अटळ आहे. याचे गंभीर परिणाम महाविकास आघाडीला भोगावे लागतील. आता सरकारविरोधात आरपारची लढाई सुरू करणार असून मोठे जनआंदोलन उभे करू. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी