शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

धास्ती कायम..त्यामुळेच काळजी महत्त्वाची कोरोनाची वर्षपूर्ती : वणवा लागू नये यासाठीच घेऊ जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:26 AM

कोल्हापूर : काळजी, पुरेशी दक्षता घेत व शासनाने घालून दिलेले नियम पाळल्यामुळेच गेल्यावर्षी कोल्हापूरची कोरोनाच्या संसर्गातून सुटका झाली आहे. ...

कोल्हापूर : काळजी, पुरेशी दक्षता घेत व शासनाने घालून दिलेले नियम पाळल्यामुळेच गेल्यावर्षी कोल्हापूरची कोरोनाच्या संसर्गातून सुटका झाली आहे. आताही तीच दक्षता बाळगणे गरजेचे आहे. कारण पुन्हा लॉकडाऊन, जनता कर्फ्यू असे उपाय आपल्याला परवडणारे नाहीत. कोरोना जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती होत असताना प्रत्येकाच्या मनांत कोरोनाची धास्ती कायम आहे. गेल्यावर्षी सुरुवात एका रुग्णाने झाली व पाहता पाहता रुग्णसंख्या वाढत गेली. रुग्णांना उपचार करायला दवाखाने पुरले नाहीत अशी स्थिती उद्‌भवली होती. त्यातून जनजीवन ठप्प झाले. अनेकांचे रोजगार गेले. नुसते उद्योग-व्यवसायाचेच चक्र थांबले नाही तर सारा गावगाडाच थांबला. त्या परिणामातून आपण अजूनही बाहेर आलेलो नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आहे. ती आटोक्यात आहे म्हणून आपण बेफिकीरपणे वागू लागलो तर ५० चा आकडा ५०० वर जायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळून व्यवहार, अनावश्यक गर्दी टाळणे या गोष्टींवर आपण सर्वांनीच आपली जबाबदारी म्हणून भर दिला पाहिजे. वणवा लागू नये म्हणून काळजी घेता येते..तो एकदा लागला की मग रोखता येत नाही याचे भान सर्वांनीच बाळगण्याची गरज आहे.