शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
2
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
3
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
4
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
5
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
6
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
7
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
8
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
9
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
10
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
11
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
12
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
13
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
14
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
15
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
16
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
17
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
18
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
19
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
20
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'

वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती

By admin | Published: August 13, 2015 12:12 AM

सायझिंग संपाबाबत समन्वयाची गरज : लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता

घन:शाम कुंभार- यड्राव -सायझिंग कामगारांच्या बेमुदत संपामुळे वस्त्रनगरीचे अर्थचक्र मंदगतीने सुरू आहे. त्यावर अवलंबून असलेल्या यंत्रमागधारकांसह सर्व घटक हवालदिल झाले आहेत. याबाबत समन्वयाने लवकर तोडगा काढण्यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता आहे; अन्यथा वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.सुधारित किमान वेतन अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांनी संपाचे हत्यार उचलले आहे. याकडे सायझिंग मालकांनी पाठ फिरवली आहे. या संपामुळे वीस-बावीस दिवसांपासून यंत्रमाग कारखान्यांना सूत बिमे मिळणे बंद होत आले असल्याने यंत्रमाग कारखाने बिमाअभावी बंद आहेत. त्याचा विपरित परिणाम यंत्रमाग कामगारांसह इतर अवलंबून असणाऱ्या घटकांवर होत आहे.सायझिंग कामगार किमान वेतनाबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु ही बाब न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयामध्ये जो निर्णय होईल तो सर्वमान्य असेल. परंतु सद्य:स्थितीत सायझिंगची चाके फिरल्यास वस्त्रोद्योगास गती मिळू शकते, अशी भावना यंत्रमागधारकांमध्ये आहे. यंत्रमाग कारखाने बिमांअभावी बंद आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेले यंत्रमागधारक पुन्हा आर्थिक अडचणीत ढकलला जात आहे. यंत्रमाग बंद असल्याने परप्रांतीय कामगारांना आपापल्या प्रांताकडे जाण्याचे वेध लागले आहेत. तर स्थानिक कामगारांना उचल देऊन त्यांना सांभाळण्याची जबाबदारी यंत्रमागधारकांवर आली आहे.सण, उत्सव समोर आल्यामुळे परप्रांतीय कामगार आपल्या भागाकडे गेल्यास तो सर्व सण, उत्सव, दीपावली करून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कामगारांअभावी यंत्रमाग व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे यंत्रमागधारकांवरील आर्थिक बोजा वाढत जाणार आहे.इचलकरंजीतील उत्पादित होणारे केंब्रिक, पॉपलीन, मलमल, आदी कापड या संपामुळे बंद राहिल्यास त्याचा व्यापार भिवंडी, मालेगाव, राजस्थान, पाली आदीकडे जाऊ शकतो. हे संभाव्य धोके हा संप लांबल्यास निर्माण होऊ शकतात. यामुळे या संपात सायझिंग मालक व कामगार यांच्यामध्ये समन्वय होणे आवश्यक आहे.कारण सायझिंग म्हणजे वस्त्रोद्योगाचे उगमस्थान आहे. सायझिंग सुरू राहिल्यास वस्त्रोद्योगास पूरक ठरते, यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता आहे; अन्यथा वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती निर्माण झाली आहे...इचलकरंजी वगळता मागणी नाहीवस्त्रोद्योग महाराष्ट्रामधील मालेगाव, भिवंडी, विटा, सोलापूर, माधवनगर या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात आहे. तेथील सायझिंग व यंत्रमाग व्यवसाय विनातक्रार सुरू आहेत. सायझिंग किमान वेतनासाठी इचलकरंजी वगळता कोठेही मागणी नसल्याची चर्चा यंत्रमागधारकांत आहे. इचलकरंजी शहरालगत असलेले यड्राव, तारदाळ, खोतवाडी, पार्वती औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सुमारे सहाशे यंत्रमाग कारखाने असून, वीस हजार यंत्रमाग आहेत.