शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

मनपाची पहिली ‘आयएसओ’प्राप्त शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:37 AM

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जाधववाडी येथील महानगरपालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, क्र. ३२ या शाळेने ‘सर्वांगीण ...

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जाधववाडी येथील महानगरपालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, क्र. ३२ या शाळेने ‘सर्वांगीण विकास’ हा निकष पूर्ण करीत ‘आयएसओ ९००१ : २०१५’ प्रमाणपत्र मिळविले आहे. आयएसओ मानांकन मिळविणारी महापालिकेची ही पहिली शाळा ठरली आहे.जाधववाडी येथे शाळेची स्थापना १९५० साली सुरू झाली. जाधववाडी, कदमवाडी, संत गोरा कुंभार वसाहत, राजीव गांधी वसाहत, गांधीनगर, मुक्त सैनिक वसाहतसह रुईकर कॉलनी, रुकडी, रुईकर कॉलनी येथील विद्यार्थी या शाळेत शिकतात. या शाळेत बालवाडीसह मराठी व सेमी-इंग्रजी असे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरतात. शाळेत ४८७ विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतेक मुलांचे पालक मध्यमवर्गीय आहेत. सामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अगोदर श्रमदान आणि मग उरलेल्या कामासाठी निधिसंकलन हे सूत्र ठरून शाळेने वाटचाल सुरू केली; त्यामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे.शाळेची सुशोभित इमारत, पहिलीपासून सेमी-इंग्लिश, बोलक्या भिंती, ई-लर्निंग सुविधा, वर्गामध्ये ग्रीन बोर्ड, अशा वैशिष्ट्यांसह दर्जेदार शिक्षणामुळे पटसंख्येचा आलेख दरवर्षी वाढत आहे. विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अ‍ॅक्वागार्डही शाळेत बसविले आहेत. विद्यार्थी वाचनालय यासारख्या वेगळ्या संकल्पना राबविल्या आहेत. शिष्यवृत्तीसह अन्य शाळाबाह्य परीक्षांतही विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. माजी महापौर वैशाली डकरे, विद्यमान नगरसेवक राजसिंह शेळके यांच्या प्रयत्नांमुळे शाळेचा कायापालट झाला आहे. परिसरातील अनेक दानशूरांच्या सहकार्यातून शाळेला सुविधा दिली आहे.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे शहरस्तर क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशिपचे उपविजेतेपद शाळेने पटकाविले आहे. शासनाकडून शाळेसाठी कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉलसाठी मैदान मंजूर झाले आहे. शाळेचा परिपाठ वैशिष्ट्यपूर्ण असून, रोज वेगळी प्रार्थना, समूहगीत म्हटले जाते. वाढदिवसाला ‘चॉकलेटऐवजी पुस्तक भेट द्या,’ या उपक्रमातून ३०० पेक्षा अधिक पुस्तके शाळेमध्ये जमा झाली आहेत. शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याने पालक वर्गही समाधानी आहे.शंभर निकष पूर्ण करून मानांकन प्राप्तशाळेने मे २०१६ मध्ये आयएसओ मानांकनासाठी संस्थेला माहिती सादर केली. जून महिन्यात अ‍ॅक्रिडिटेशन बोर्डाकडून पाहणी केली. शाळेकडून आएसओसाठी २३ जुलैला नोंदणी केली. संस्थेच्या त्रिसदस्यीय समितीकडून २५ आॅगस्टला शाळेची तपासणी करून त्रुटी दूर करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला. त्रुटी दूर करून ५ सप्टेंबर २०१६ रोजी आयएसओ मानांकन जाहीर. १०० निकष पूर्ण करून हा मान मिळविला आहे. यामध्ये ७० टक्के भौतिक सुविधा, तर ३० टक्के गुणवत्तेवर गुण दिले.