शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

जिल्ह्यातील पहिली उचल सरासरी २०४५ रुपये

By admin | Published: December 16, 2015 12:01 AM

सरकारकडूनच कायद्याला तिलांजली

कोल्हापूर : राज्य सरकार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये ८०-२० टक्के असा समझोता केला असला तरी उर्वरित २० टक्के साखरेचे दर व कारखान्यांना उपलब्ध होणारे पैसे, यावरच अवलंबून राहणार आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांना ८० टक्क्यांप्रमाणे सरासरी २०४५, तर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १८८४ रुपये पहिली उचल मिळेल.गत हंगामात कारखान्यांनी ओढूनताणून एकरकमी एफआरपी दिली. त्यामुळे हंगामाच्या शेवटी गाळप झालेल्या शेतकऱ्यांना दुसरा हंगाम आला तरी पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे यंदा कारखानदारांची सावध भूमिका घेत एकरकमी एफआरपीला सुरुवातीपासूनच नकारघंटा होती. परंतु, ‘स्वाभिमानी’ने एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देऊन महिन्याची मुदत दिली. मात्र, हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी कारखानदार दराबाबत तोंड उघडत नाहीत. महिन्याची मुदत संपल्यानंतर ‘स्वाभिमानी’ने चक्काजामचा इशारा दिला; पण सहकारमंत्र्यांनी त्यांना चर्चेला बोलावले. एकरकमीवरून नरमाईची भूमिका घेत दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ८० टक्के व दुसऱ्या टप्प्यात २० टक्के, असा समझोता झाला. जिल्ह्याची एफआरपी पाहिली तर सर्वांत कमी राजाराम, कसबा बावड्याची २४०८; तर सर्वाधिक २६८५ रुपये कुंभी-कासारी, कुडित्रेची आहे. सरकारशी झालेल्या समझोत्यानुसार ८० टक्के रक्कम द्यायची म्हटले तर जिल्ह्यातील कारखान्यांना सरासरी २०४५ रुपये, तर सांगली जिल्ह्यातील कारखान्यांना १८८४ रुपये देय लागते. बाजारातील साखरेचे दर सुधारले तरच उर्वरित २० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी पुढील हंगाम उजाडेल, अशीच सध्याची परिस्थिती आहे. सरकारकडूनच कायद्याला तिलांजली‘स्वाभिमानी’ने जरी नरमाईची भूमिका घेत ‘एफआरपी’चे तुकडे पाडण्यास परवानगी दिली असली तरी सरकार याबाबत अध्यादेश काढते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. ‘एफआरपी’ हा केंद्राचा कायदा आहे. त्याची पायमल्ली करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. सरकारच कायद्याला तिलांजली देणार असेल, तर न्याय मागायचा कोणाकडे? असा सवाल शेतकरी करीत आहेत. सॉफ्ट लोनचा १८ कोटींचा हप्ता सरकारने कारखान्यांना २०१३-१४ व १४-१५ या हंगामात सॉफ्ट लोन दिले होते. त्याचे हप्ते एप्रिल २०१६ पासून कारखान्यांना द्यावे लागणार आहेत. हा हप्ता टनाला साधारणत: तीनशे रुपयांप्रमाणे प्रत्येक कारखान्याला सरासरी १८ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे उर्वरित २० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात लवकर पडण्याची शक्यता फारच कमी आहे.