शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

पंचगंगा नदीपात्रात हजारो मासे पडले मृत्युमुखी, प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 12:58 PM

अहवाल आल्यानंतर या माशांच्या मृत्यूचे कारण निश्चितपणे सांगण्यात येईल

कोल्हापूर : कसबा बावडा शिये पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने याठिकाणच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याची तपासणी झाल्यानंतर चार दिवसांत अहवाल आल्यानंतर या माशांच्या मृत्यूचे कारण निश्चितपणे सांगण्यात येईल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी मंगळवारी दिली.पंचगंगा नदीच्या शिये पुलाजवळील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे हे मासे मृत्यू पावल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. हे हजारो मासे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असल्याचे चित्र होते. हा प्रकार गेली दोन वर्षे सुरू असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. येथील पाणी काळसर, हिरवट रंगाचे असल्याने या नदीपात्रात रसायन मिसळत असावे, असा अंदाज आहे. हे पाणी प्रवाहित नसल्यामुळे येथील माशांना ऑक्सिजन मिळत नसावे.या वृत्ताची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी या परिसरातील पाण्याचे नमुने घेतले. या नमुन्याचा अहवाल दोन दिवसात उपलब्ध होईल, त्यानंतर या माशांच्या मृत्यूचे कारण समजेल, अशी माहिती मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी दिली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण