शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

भयावह..! पंचगंगा बनली विषगंगा, प्रदुषणाच्या दाहकतेचे टोक; प्रशासनाने हात झटकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 11:51 AM

विकास करताना कोणतेही तारतम्य न बाळगल्याने एखाद्या नदीचे वाटोळे कसे लागू शकते, हे सध्याच्या पंचगंगा नदीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते.

कोल्हापूर : प्राचीन काळापासून आपल्याकडे नदी हे एक त्या त्या परिसराचे वैभव मानले गेले आहे. परंतु विकास करताना कोणतेही तारतम्य न बाळगल्याने एखाद्या नदीचे वाटोळे कसे लागू शकते, हे सध्याच्या पंचगंगा नदीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. गुरुवारी नदीकाठाने शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यापर्यंत गेल्यानंतर दुर्गंधी, काळे, पिवळे पाणी आणि काही ठिकाणी काठाला तरंगणारे मृत मासे असेच चित्र दिसून आले.

कोल्हापूर महापालिका, ३९ ग्रामपंचायती, इचलकरंजी नगरपालिका, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील अनेक औद्योगिक वसाहती, तेथील प्रक्रिया उद्योग यांच्या सांडपाण्यामुळे या नदीची अक्षरश: रसायनगंगा झाली आहे. याबद्दल गेली अनेक वर्षे आवाज उठवला जात असला, तरी सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे पंचगंगा गटारगंगाच बनत आहे.वळिवडे बंधाऱ्याजवळ हजारो मृत माशांचा खच पडल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर येथून पाणी खाली सोडण्यात आले. त्यामुळे मृत मासे खालीपर्यंत वाहत गेले. परिणामी रूकडी बंधाऱ्याच्या अलिकडे आणि पलिकडे तरंगणारे मासेच पाहायला मिळाले. या ठिकाणी धुणे धुणाऱ्या महिला नाकाला पदर बांधूनच धुणे धुवत होत्या. काठावर माशांचा एवढा खच होता की, पाय कुठे ठेवायचा, हेच कळत नव्हते. काठावरील चिखलात माशांचाही चिखल अशीच परिस्थिती होती. त्याच दुर्गंधीमध्ये पर्याय नसल्याने या महिला धुणे धुवत होत्या.

येथून पुढे रूई बंधाऱ्याजवळ गेल्यानंतर फारसे वेगळे चित्र नव्हते. रूकडी बंधाऱ्याकडून वाहत आलेले मृत मासे या बंधाऱ्याच्या अलिकडे नदीच्या दोन्ही कडेला तरंगत होते. त्याचा घाण वास परिसरात पसरला होता. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याच्या वर येऊन ऑक्सिजन घेण्यासाठी धडपडणारे मासे या ठिकाणी पाहावयास मिळत होते.

रुकडीपर्यंतच मृत मासेगांधीनगरच्या खालच्या बाजूस आणि रूकडी बंधाऱ्याच्या अलिकडच्या टप्प्यातच हे मासे मेले आहेत. गांधीनगरच्या वर आणि रूकडी बंधाऱ्याखाली मासे मेलेले नाहीत. त्यामुळे याच मधल्या भागातच हे मासे मेले आहेत.

गळती झाल्याची शक्यता

या परिसरातील एका रासायनिक कारखान्यातील गळती होऊन थेट रसायनच पंचगंगेमध्ये मिसळल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याआधी पाणी खराब झाल्याने केंदाळ दरवर्षीच वाढते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे पहिल्यांदाच मेल्याचे सांगण्यात आले.प्रशासनाने हात झटकलेपंचगंगा नदीतील मृत मासे बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावण्यास भाग पाडण्यास जिल्हा प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही. त्यांनी हात झटकल्याने इतर कोणताही विभाग याकडे गांभिर्यांने पाहत नसल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

सात, आठ दिवस झाले पाण्याला घाण वास येतच होता. आता मेलेल्या माशांच्या वासाने डोकं दुखायला लागले आहे. गावात जर जादा पाणी सोडले असते, तर आम्ही धुण्याला नदीला कशाला आलो असतो. पण गरिबाचं ऐकणार कोण. गावातसुध्दा दोन रुपये लिटर पाणी विकत घ्यायची वेळ आली आहे. पाणी शुध्द करत्यात; पण हे पाणी शुध्द केलं तरी प्यायजोगं आहे काय, तुम्ही सांगा. -हजरतबी दरवेशी, रहिवासी, रूकडी

मी गेल्या दहा दिवसांपासून रूकडी बंधाऱ्याजवळ सरबत आणि ताक विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु या ठिकाणी सरबत घेण्यासाठी थांबणारा प्रत्येकजण पाणी कुठलं वापरताय, असे विचारतो. त्यामुळे मी गावातूनच विकत पाणी आणतो. - राजुद्दीन मुजावर चिंचवाड

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणWaterपाणी