शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
3
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
4
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
5
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
6
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
7
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
8
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
9
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
10
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
11
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
12
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
14
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
15
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
16
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
17
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
18
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
19
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
20
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

महापूर लवकर ओसरला; ऊस नुकसानाने शेतकरी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:29 AM

सरदार चौगुले, लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : कमी वेळेत जादा पाऊस लागल्याने जिल्ह्यातील नद्यांनी महापुराची परिसीमा गाठली ...

सरदार चौगुले,

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : कमी वेळेत जादा पाऊस लागल्याने जिल्ह्यातील नद्यांनी महापुराची परिसीमा गाठली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदा आलेल्या महापुराने माती मिश्रित गाळयुक्त वाहून आणलेले पाणी बुडालेल्या पिकांना बाधित ठरल्याने नुकसानाचा टक्का वाढला आहे. महापूर लवकर ओसरला असला तरी गाळयुक्त माती पिकांच्या शेंड्यात आणि पानावर साचून राहिल्याने हळूहळू नुकसानाची तीव्रता गडद होताना दिसत आहे. ऊस पिकावर आर्थिक घडी बसवणारा शेतकरी गाळयुक्त महाराष्ट्र पुराच्या धोक्याने आर्थिकदृष्ट्या चांगला घसरला आहे.

आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पूर ओसरण्यासाठी केलेला प्रयत्न सकारात्मक असला तरी पीक नुकसानाचे चित्र भयावह आहे. पुराच्या पाण्यात कुजलेल्या उसाची उन्हाच्या तीव्रतेने खोडवी होते. नदीकाठच्या पिकांचा नुकसानाने रंग बदलेला असतानासुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळविण्यासाठी आणि सवलतीच्या योजनांसाठी झगडावे लागते. हीच बळीराजाच्या वाट्याला आलेली मोठी शोकांतिका आहे.

प्रत्येक पावसाळ्यात जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात नदीला एक-दोन पूर येऊन जात असल्याचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. पहिल्या पुरादरम्यान वाहून आलेली माती मिश्रीत गाळ पाण्याच्या प्रवाहात निघून गेल्यामुळे त्यानंतर येणाऱ्या मोठ्या पुरात पिकांची हानी होत नाही. त्यामुळे पीक नुकसानाचे प्रमाण कमी असते; परंतु यंदा सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे लहानसहान येणारे पूर आले नाही, त्यामुळे माती मिश्रीत गाळ आणि केपटा वाहून गेला नाही. अतिवृष्टी आणि कमी वेळेत जादा पाऊस लागल्यामुळे नद्यांचे पाणी झपाट्याने वाढले. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे डोंगरमाथ्यावरील माती वाहून आल्यामुळे, माती मिश्रीत गाळाचे प्रमाण वाढले. बुड क्षेत्रात सर्वत्र गाळयुक्त पाणी पसरल्याने पूर ओसरेल तसा गाळ उसाच्या शेंड्यात आणि पानावर साचून राहिला. परिणामी, ऊसाचा शेंडा कुजला आहे, तर पाने करपून गेली आहेत. याचा उसाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात कमालीची घट होणार आहे. काबाडकष्ट आणि भरमसाठ उत्पादन खर्च करून वाढविलेले ऊस पीक महापुराच्या संकटाने वाया गेल्याने त्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या आकडेवारी आणि तारखेकडे लक्ष लावून आहे.

प्रतिक्रिया

प्रत्येक वर्षी मोठ्या पुराच्या अगोदर लहानसहान एक-दोन पूर आल्यामुळे नदीकाठचे कमी क्षेत्र पाण्याखाली जाते, त्यामुळे नुकसानाचे प्रमाण कमी असते. यावर्षीची परिस्थिती गंभीर होती. पहिलाच माती मिश्रीत गाळयुक्त महापूर आल्याने ऊस पिकासाठी बाधिकार ठरला आहे.

पूर लवकर ओसरूनही २०१९ पेक्षा नुकसानाचा टक्का जादा आहे. त्यामुळे शासनाने १०० टक्के नुकसान गृहित धरून नुकसान भरपाई त्वरित द्यावी.

रामराव चेचर, पन्हाळा तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

चौकट

पूर बाधित क्षेत्रात माती मिश्रीत गाळ ऊसाच्या शेंडा गेल्याने तो कुजून बाहेर पडतो. पानावर गाळ साचल्याने अन्नद्रव्य निर्मितीसाठी उपयुक्त असलेली सूर्य संश्लेषण प्रक्रिया थांबते. परिणामी,उसाची वाढ थांबते. शेंडा कुजल्यामुळे खालच्या उसाला फुटवे सुटतात. सुटलेले फुटवे उसातील अन्न रस शोषून घेतल्यामुळे जिवंत असलेला उसाचा बुडका पोकळ होतो. त्याचा परिणाम उसाच्या वाढीवर झाल्याने उत्पादनात कमालीची घट येते.